शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिमोफेलिया रुग्णांना मिळाले ‘स्वावलंबन कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:30 IST

२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली.

औरंगाबाद : रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदाच स्वावलंबन कार्ड प्राप्त झाल्याने हिमोफेलियाच्या रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यासारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. तेव्हापासून दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड मिळण्याची प्रतीक्षा होती. याविषयी जागतिक अपंगदिनी ३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले. अखेर घाटीत गुरुवारी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कार्ड वितरणास सुरुवात झाली.

रुग्णालयाचा व्यवसाय आणि भौतिकोपचार केंद्रात या कार्डाचे वाटप झाले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. चंद्र्रकांत थोरात, वरिष्ठ व्यवसाय उपचारतज्ज्ञ डॉ. सतीश मसलेकर, भौतिक व्यवसाय उपचारतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. अभिषेक कल्लूरकर, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. अब्दुल्ला अन्सारी आणि डॉ. आलक पठाण, तसेच विजय वारे यांची उपस्थिती होती.

यावेळी सागर चुगडे यास पहिले कार्ड प्राप्त झाले. यासह सौरभ धूत, वरुण साबळे, मुबसीर खान आणि अमोल जाधव यांना प्रमाणपत्र मिळाले. यावेळी निवासी डॉ. शरद साळोखे, डॉ. मिलिंद लोखंडे, डॉ. श्रेयस घोटवडेकर, डॉ. अनुज पाटील, डॉ. मशुद्दूल शेख, डॉ. प्रतीक राठोड उपस्थित होते.रक्त गोठत नाहीरक्तातील विशिष्ट घटकाच्या कमतरतेने हिमोफेलियात रक्त गोठत नाही. त्यामुळे रक्तघटक घ्यावे लागतात. पूर्वी सुविधा नसल्याने रुग्णांना मुंबईला जावे लागले. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. याबरोबरच स्वावलंबन कार्डची सुविधा घाटीत सुरू झाली आहे, असे डॉ. सतीश मसलेकर यांनी सांगितले.

मुंबईला जाणे थांबलेपूर्वी रक्त घटकासाठी मुंबईला जावे लागत असे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधा मिळाली. त्यामुळे मुंबई गाठायची वेळ येत नाही, असे सागर चुगडे, सौरभ धूत यांनी सांगितले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद