शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

हिमोफेलिया रुग्णांना मिळाले ‘स्वावलंबन कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:30 IST

२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली.

औरंगाबाद : रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदाच स्वावलंबन कार्ड प्राप्त झाल्याने हिमोफेलियाच्या रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यासारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. तेव्हापासून दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड मिळण्याची प्रतीक्षा होती. याविषयी जागतिक अपंगदिनी ३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले. अखेर घाटीत गुरुवारी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कार्ड वितरणास सुरुवात झाली.

रुग्णालयाचा व्यवसाय आणि भौतिकोपचार केंद्रात या कार्डाचे वाटप झाले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. चंद्र्रकांत थोरात, वरिष्ठ व्यवसाय उपचारतज्ज्ञ डॉ. सतीश मसलेकर, भौतिक व्यवसाय उपचारतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. अभिषेक कल्लूरकर, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. अब्दुल्ला अन्सारी आणि डॉ. आलक पठाण, तसेच विजय वारे यांची उपस्थिती होती.

यावेळी सागर चुगडे यास पहिले कार्ड प्राप्त झाले. यासह सौरभ धूत, वरुण साबळे, मुबसीर खान आणि अमोल जाधव यांना प्रमाणपत्र मिळाले. यावेळी निवासी डॉ. शरद साळोखे, डॉ. मिलिंद लोखंडे, डॉ. श्रेयस घोटवडेकर, डॉ. अनुज पाटील, डॉ. मशुद्दूल शेख, डॉ. प्रतीक राठोड उपस्थित होते.रक्त गोठत नाहीरक्तातील विशिष्ट घटकाच्या कमतरतेने हिमोफेलियात रक्त गोठत नाही. त्यामुळे रक्तघटक घ्यावे लागतात. पूर्वी सुविधा नसल्याने रुग्णांना मुंबईला जावे लागले. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. याबरोबरच स्वावलंबन कार्डची सुविधा घाटीत सुरू झाली आहे, असे डॉ. सतीश मसलेकर यांनी सांगितले.

मुंबईला जाणे थांबलेपूर्वी रक्त घटकासाठी मुंबईला जावे लागत असे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधा मिळाली. त्यामुळे मुंबई गाठायची वेळ येत नाही, असे सागर चुगडे, सौरभ धूत यांनी सांगितले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद