शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदतीचा हात

By admin | Updated: June 13, 2016 00:47 IST

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने नवऊर्जा मिळाली, सकल जैन समाजाने मदतीचा हात पुढे करून त्यांना मोफत बियाणे व खत दिले... यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवतेज, नवी आशा निर्माण झाली होती. नव्या उमेदीने पुन्हा शेतीच्या कामाला लागू आणि शेतीला सुजलाम, सुफलाम करू, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने गुरु राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभय महोत्सव’ शहरात सुरू आहे. रविवारी सकाळी पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे आयोजित ‘माणुसकी’च्या सोहळ्यात शेतकरी सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रशांत देसरडा यांच्यासह सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे, खत देण्यात आले. राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या भरवशावर देशाची अर्थव्यवस्था चालते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. जैन समाज नेहमी मदतीसाठी अग्रेसर असतो, असेही त्यांनी नमूद केले. आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला. यंदा पाऊस चांगला पडेल, भरघोस पीक येईल. देव उशिरा देतो, पण अन्याय करीत नाही, असे महाराज म्हणताच शेतकऱ्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेला. पंन्यास योगरत्न मुनीजी म्हणाले की, मानव प्रेमापासूनच जैन धर्माची सुरुवात होते. सकल जैन समाज नेहमी मदतीसाठी पुढे असतो, आजही शेतकऱ्यांना योग्य वेळी बियाणे-खत वाटप करून जैन समाजाने ‘माणुसकीचे दर्शन’ घडविले. यानंतर शेतकऱ्यांनी आचार्यश्रींचे रांगेत दर्शन घेतले. प्रास्ताविक महावीर पाटणी यांनी तर संचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी चांदमल सुराणा, ललित पाटणी, रतिलाल मुगदिया, मदनलाल अच्छा, विनोद बोकाडिया, मिठालाल कांकरिया, रवी मुगदिया, विलास साहुजी, पीयूष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा आदी पदाधिकारी व समाजबांधव हजर होते.