शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

शेतकऱ्यांना मदतीचा हात

By admin | Updated: June 13, 2016 00:47 IST

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने नवऊर्जा मिळाली, सकल जैन समाजाने मदतीचा हात पुढे करून त्यांना मोफत बियाणे व खत दिले... यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवतेज, नवी आशा निर्माण झाली होती. नव्या उमेदीने पुन्हा शेतीच्या कामाला लागू आणि शेतीला सुजलाम, सुफलाम करू, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने गुरु राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभय महोत्सव’ शहरात सुरू आहे. रविवारी सकाळी पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे आयोजित ‘माणुसकी’च्या सोहळ्यात शेतकरी सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रशांत देसरडा यांच्यासह सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे, खत देण्यात आले. राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या भरवशावर देशाची अर्थव्यवस्था चालते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. जैन समाज नेहमी मदतीसाठी अग्रेसर असतो, असेही त्यांनी नमूद केले. आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला. यंदा पाऊस चांगला पडेल, भरघोस पीक येईल. देव उशिरा देतो, पण अन्याय करीत नाही, असे महाराज म्हणताच शेतकऱ्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेला. पंन्यास योगरत्न मुनीजी म्हणाले की, मानव प्रेमापासूनच जैन धर्माची सुरुवात होते. सकल जैन समाज नेहमी मदतीसाठी पुढे असतो, आजही शेतकऱ्यांना योग्य वेळी बियाणे-खत वाटप करून जैन समाजाने ‘माणुसकीचे दर्शन’ घडविले. यानंतर शेतकऱ्यांनी आचार्यश्रींचे रांगेत दर्शन घेतले. प्रास्ताविक महावीर पाटणी यांनी तर संचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी चांदमल सुराणा, ललित पाटणी, रतिलाल मुगदिया, मदनलाल अच्छा, विनोद बोकाडिया, मिठालाल कांकरिया, रवी मुगदिया, विलास साहुजी, पीयूष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा आदी पदाधिकारी व समाजबांधव हजर होते.