शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराजांच्या गैरहजेरीत जय बाबाजी परिवाराची आ.जाधव यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:24 IST

जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली.

ठळक मुद्देजय बाबाजी परिवाराचा पाठिंबा ही महाराजांची भूमिका नाही आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे.

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर गुरुवारी मठाशी निगडित असलेल्या जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका वेरूळ येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. विशेष म्हणजे ही घोषणा परिवार आणि राजकीय समितीने केली असून, यावेळी शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती नव्हती.

मठाचे सचिव रामानंद महाराज यांनी सांगितले, परिवाराने पाठिंबा जाहीर केला ही महाराजांची भूमिका नाही; परंतु त्यांच्या परवानगीने हे घडले आहे. महाराज ओझर येथे अनुष्ठानाला असल्यामुळे ते गैरहजर होते. दरम्यान, प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांनी आ. जाधव यांचे मोबाईलवरून शांतीगिरी महाराज यांच्याशी बोलणे करून दिल्याचा दावा केला. यावेळी उमेदवार आ. जाधव यांनी युतीचे उमेदवार विद्यमान खा. चंद्रकांत खैरे सक्षम नसल्याचा आरोप केला, केंद्रातील अनेक योजना त्यांना जिल्ह्यात आणता आल्या नसल्याचेही ते म्हणाले. काकासाहेब गोरे, झुंबर मोडके, राजाभाऊ पानगव्हाणे, साहेबराव आगळे, रवींद्र घोडके, शेकनाथ होळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. कुठलेही मानधन न घेता परिवाराचे ५० वाहने प्रचारात उतरणार आहेत. हा निर्णय फक्त औरंगाबादपुरता मर्यादित असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

१ लाख ४० हजार सदस्य ठरणार गेमचेंजरजय बाबाजी परिवाराचे १ लाख ४० हजार सदस्य आहेत. हे सदस्य मठाशी निगडित असून ते गेमचेंजर ठरतील, असा दावा प्रचारप्रमुख पवार यांनी केला. आ. जाधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. पाणीपुरवठा, शहर स्वच्छता, कचऱ्यामुळे संभाजीनगरची (औरंगाबादची) बदनामी झाली. जाती-पातीचे राजकारण सुरू झाले आहे, उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढत आहे. सामाजिक एकोपा संपला आहे. शेतकरी त्रस्त असून, ग्रामीण रस्त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. विद्यमान खासदाराने कामे केली नाहीत काय? ते युतीचे उमेदवार आहेत, मोदींनाच पाठिंबा देणार आहेत. २० वर्षांत त्यांनी काही नाही केले का? यावर पवार म्हणाले, आजवर खैरेंनाच पाठिंबा दिला; परंतु यावेळी परिवाराशी चर्चा, पाहणी केल्यानंतर मतदान वाया जाऊ नये म्हणून आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे. जय बाबाजी परिवारात जास्तीचे सदस्य मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांचा दबाव होता म्हणून पाठिंबा दिला काय? यावर पवार म्हणाले, हा सर्वसमावेशक चर्चेअंती निर्णय झाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019