शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराजांच्या गैरहजेरीत जय बाबाजी परिवाराची आ.जाधव यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:24 IST

जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली.

ठळक मुद्देजय बाबाजी परिवाराचा पाठिंबा ही महाराजांची भूमिका नाही आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे.

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर गुरुवारी मठाशी निगडित असलेल्या जय बाबाजी परिवाराने लोकसभा निवडणूक मैदानातील अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याची भूमिका वेरूळ येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. विशेष म्हणजे ही घोषणा परिवार आणि राजकीय समितीने केली असून, यावेळी शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती नव्हती.

मठाचे सचिव रामानंद महाराज यांनी सांगितले, परिवाराने पाठिंबा जाहीर केला ही महाराजांची भूमिका नाही; परंतु त्यांच्या परवानगीने हे घडले आहे. महाराज ओझर येथे अनुष्ठानाला असल्यामुळे ते गैरहजर होते. दरम्यान, प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांनी आ. जाधव यांचे मोबाईलवरून शांतीगिरी महाराज यांच्याशी बोलणे करून दिल्याचा दावा केला. यावेळी उमेदवार आ. जाधव यांनी युतीचे उमेदवार विद्यमान खा. चंद्रकांत खैरे सक्षम नसल्याचा आरोप केला, केंद्रातील अनेक योजना त्यांना जिल्ह्यात आणता आल्या नसल्याचेही ते म्हणाले. काकासाहेब गोरे, झुंबर मोडके, राजाभाऊ पानगव्हाणे, साहेबराव आगळे, रवींद्र घोडके, शेकनाथ होळकर आदींची यावेळी उपस्थिती होती. कुठलेही मानधन न घेता परिवाराचे ५० वाहने प्रचारात उतरणार आहेत. हा निर्णय फक्त औरंगाबादपुरता मर्यादित असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

१ लाख ४० हजार सदस्य ठरणार गेमचेंजरजय बाबाजी परिवाराचे १ लाख ४० हजार सदस्य आहेत. हे सदस्य मठाशी निगडित असून ते गेमचेंजर ठरतील, असा दावा प्रचारप्रमुख पवार यांनी केला. आ. जाधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. पाणीपुरवठा, शहर स्वच्छता, कचऱ्यामुळे संभाजीनगरची (औरंगाबादची) बदनामी झाली. जाती-पातीचे राजकारण सुरू झाले आहे, उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढत आहे. सामाजिक एकोपा संपला आहे. शेतकरी त्रस्त असून, ग्रामीण रस्त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. विद्यमान खासदाराने कामे केली नाहीत काय? ते युतीचे उमेदवार आहेत, मोदींनाच पाठिंबा देणार आहेत. २० वर्षांत त्यांनी काही नाही केले का? यावर पवार म्हणाले, आजवर खैरेंनाच पाठिंबा दिला; परंतु यावेळी परिवाराशी चर्चा, पाहणी केल्यानंतर मतदान वाया जाऊ नये म्हणून आ.जाधव यांना सात कलमी मागण्यांच्या आधारे पाठिंबा दिला आहे. जय बाबाजी परिवारात जास्तीचे सदस्य मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांचा दबाव होता म्हणून पाठिंबा दिला काय? यावर पवार म्हणाले, हा सर्वसमावेशक चर्चेअंती निर्णय झाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019