शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या

By admin | Updated: August 24, 2014 00:29 IST

पालम : शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी केली आहे.

पालम : पावसाळा संपत आला तरीही पाऊस पडलेला नाही. शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी केली आहे. शहरातील जायकवाडी वसाहतीच्या परिसरात शिवसेनेच्या वतीने २३ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता पालम-पूर्णा-गंगाखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. बंडू जाधव, डॉ. राहूल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. शिवाजी दळणर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, सखुबाई लटपटे, सुनिता घाडगे, सुरेश ढगे, दशरथ भोसले, चंद्रकांत रुद्रवार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना वडले म्हणाले, शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेने खरिपाची पेरणी उरकून घेतली आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने केवळ मराठवाडा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास दुष्काळ जाहीर करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सिंचनाचा अभाव व शेतीमालाला भाव नसल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करावी व दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी बाळासाहेब राखे, विष्णू मुरकुटे, गजानन पवार, गजानन सिरस्कर, प्रल्हाद रोकडे, शिवाजी खंडागळे, अंकूश भातमोडे, हनुमंत पौळ, सुग्रीव पौळ, पांडुरंग होळगे, सतीश शिंदे, मोहिते यांच्यासह पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)