शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या

By admin | Updated: August 24, 2014 00:29 IST

पालम : शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी केली आहे.

पालम : पावसाळा संपत आला तरीही पाऊस पडलेला नाही. शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी केली आहे. शहरातील जायकवाडी वसाहतीच्या परिसरात शिवसेनेच्या वतीने २३ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता पालम-पूर्णा-गंगाखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. बंडू जाधव, डॉ. राहूल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. शिवाजी दळणर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, सखुबाई लटपटे, सुनिता घाडगे, सुरेश ढगे, दशरथ भोसले, चंद्रकांत रुद्रवार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना वडले म्हणाले, शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेने खरिपाची पेरणी उरकून घेतली आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने केवळ मराठवाडा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास दुष्काळ जाहीर करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सिंचनाचा अभाव व शेतीमालाला भाव नसल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करावी व दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी बाळासाहेब राखे, विष्णू मुरकुटे, गजानन पवार, गजानन सिरस्कर, प्रल्हाद रोकडे, शिवाजी खंडागळे, अंकूश भातमोडे, हनुमंत पौळ, सुग्रीव पौळ, पांडुरंग होळगे, सतीश शिंदे, मोहिते यांच्यासह पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)