शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

रडगाणे गाण्याऐवजी धाडसाने मदत करा

By admin | Updated: December 5, 2014 00:59 IST

जालना : राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे रडगाणे गाण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने धाडसाने पुढे येऊन सर्वतोपरी मदत करावी,

जालना : राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे रडगाणे गाण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने धाडसाने पुढे येऊन सर्वतोपरी मदत करावी, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.जिल्ह्यातील डांबरी, शेवगा, रुई-भायडी या दुष्काळग्रस्त गावांना पवार यांनी गुरुवारी सकाळी भेटी दिल्या. ग्रामस्थांशी संवाद करीत पीक परिस्थतीची पाहणी केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी खा. अंकुशराव टोपे, आ. धनंजय मुंडे, आ. सतिष चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.मराठवाडा, विदर्भातील अभुतपूर्व दुष्काळामुळे सर्वसामान्य शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. याआपत्तीत शेतकऱ्यांना आता भक्कम मदतीचीच नितांंत गरज आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भयावह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मदतीचा मोठा हात दिला. त्याचप्रमाणे आता या शेतकऱ्यांना सर्वार्थाने पाठबळाची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून त्यातून पुढे आलेली वस्तुनिष्ठ परिस्थिती अधिवेशनातून सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे ते म्हणाले. सरकारी पातळीवरुन मदतीसंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. परंतु यासंदर्भात तात्काळ ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहेत, असेही ते म्हणाले. मराठवाड्यात आजही आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना बॅँकाद्वारे नोटिसा बजावल्या जात आहेत. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत होत असून डीपीसाठी पैश्यांची मागणी होत असल्याबद्दल पवार यांनी तीव्र खंत व्यक्त केली. दरम्यान या दौऱ्या प्रसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवार यांच्यासमोर मांडल्या, मदती द्यावी, अशी विनंती केली. (प्रतिनिधी)जायकवाडीतील जलसाठ्यातून औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्याचे तात्काळ आरक्षण करावे व उर्वरित पाण्याचेही नियोजन करावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.४सर्वसामान्य शेतकऱ्यांतून संपूर्ण पीक कर्जाची माफी, वीज बिलांची माफी, पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, शेतसारा माफ व्हावा. शैक्षणिक शुल्क पूर्णत: माफ करावे, अशी अपेक्षा होत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. कापूस उत्पादकांना बोनस ऐवजी एकरी सहाय्य अनुदानाची अपेक्षा आहे. सोयाबीन उत्पादकांचाही तोच सूर आहे, असेही ते म्हणाले. ४दुष्काळी स्थितीत शेततळ्यांची कामे करावीत. प्रकल्पातील गाळ काढणी करावी, छोट्या-मोठ्या नद्यांवर सिमेंट, शिरपूर, भूमिगत किंवा कोल्हापुरी बंधारे उभारावेत. दुष्काळी भागात चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले.४शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. उस्मानाबादेत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या स्थितीत सरकारने आम्ही बरोबर आहोत. अडचणीत साथ देवू, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत, खरीप व रबी हंगामातील पिकांची स्थिती जाणून घेतली. पाणीटंचाईची समस्या ऐकली.