शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

‘धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत’

By admin | Updated: August 18, 2014 00:57 IST

जालना : धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत मिळत असून, ही भांडवलशाही धर्माच्या नावावर राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे,

जालना : धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत मिळत असून, ही भांडवलशाही धर्माच्या नावावर राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते व विश्लेषक डॉ.भालचंद्र कांगो यांनी येथे केले.जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘जागतिकीकरणात कामगार चळवळीचे भवितव्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून कामगार नेते अण्णा सावंत यांची उपस्थिती होती. तसेच प्रसिध्द लेखक विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, प्रा.श्याम मुंडे आदींची वक्ते म्हणून उपस्थिती होती.यावेळी बोलतांना डॉ.कांगो म्हणाले की, धर्मांध शक्तीला रोख शकणारी एकही शक्ती आज नाही, जाती धर्माच्या नावाने रोज नवीन संघटना वाढत आहे.जाती धर्माला पाठिंबा देवून पिळवणुकीवर आधारीत समाजरचना निर्माण होत आहे. कामगार चळवळीला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र भांडवलदारांकडून रचले जात आहे. मात्र, कामगार चळवळ ही पृथ्वीच्या अंतापर्यंत जीवंत राहील, यात शंका नाही. भारतीय समाज रचनेत संघटीत व असंघटीत कामगार मोठ्या प्रमाणात असले तरी जाती व धर्मात ते विखुरले गेले आहेत. भांडवलशाही समाजात विषमता निर्माण करून देशातील कष्टकरी व कामगारांना नागडे करण्याच्या प्रयत्नात आहेत. भांडवलशाहीचा हा डाव कष्टकरी व कामगारांनी संघटीत होऊन उधळून लावावा, असे आवाहनही डॉ.कांगो यांनी केले.यावेळी बोलतांना डॉ.प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, मध्यमवर्गीयामुळे समस्त चळवळीला धोका निर्माण झाला आहे. हा मध्यमवर्गीय समाज कुठलीही भूमिका घेत नाही. त्यांच्याकडून नितीपालनाचे कार्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व उपेक्षित समाज संघटीत होत नाही. जागतिकीकरणात मानवी मुलभूत सुविधा उपलब्ध न करता उलट तीर्थक्षेत्राच्या विकासावर उधळपट्टी केली जात आहे. मानवी विकासाकडे लक्ष दिले जाईल, अशी परिस्थिती आज तरी दिसत नसल्याचे डॉ.लुलेकर म्हणाले.यावेळी बोलतांना डॉ.श्याम मुडे म्हणाले की, कष्टकरी व कामगारवर्ग या भांडवलाहीत बेदखल झाला आहे. आज या कष्टकरी व कामगारांना बेदखल समाज म्हणून बघितले जात आहे. या समाजाचे प्रश्न जागतिकीकरणामुळे अत्यंत बिकट झाले असून, या समाजाला संघटीत करून त्यांची दखल घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.अध्यक्षीय समारोप करतांना कामगार नेते अण्णा सावंत म्हणाले की, जागतिकीरणात कामगार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी संघटन आवश्यक असून, भांडवलशाही विरूध्द एकसंघ होऊन लढा उभारण्याची आज गरज आहे. कष्टकरी व कामगारांना सोबत घेऊन सर्वांनी त्यांना विकासाच्या मार्गावर आणले पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)