शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

बोंडअळीच्या मदतीत सिल्लोड तालुक्यावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:49 IST

श्यामकुमार पुरे सिल्लोड : तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाल्यानंतर जाहीर झालेल्या मदतीत तालुक्यातील सहा मंडळांवर अन्याय करण्यात आल्याने ...

श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाल्यानंतर जाहीर झालेल्या मदतीत तालुक्यातील सहा मंडळांवर अन्याय करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने हा अन्याय केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.बोंडअळीमुळे आलेले कापूस पीक हातचे गेले. याबाबत नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र पंतप्रधान पिकविमा योजना, चाचणी प्रयोग, मागील ५ वर्षांचे पीक कापणी प्रयोग, नमुना सॅम्पल पद्धत, सांख्यिकी आकडे असे विविध निकष लावून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील ६ महसूल मंडळे वगळली. यामुळे तालुक्यातील १८ हजार ७७५ शेतकरी पात्र ठरले आहे तर ५९ हजार ७२० शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. विविध निकष लावून वगळण्यात आलेल्या महसूल मंडळात अजिंठा, बोरगाव बाजार, अंभई, गोळेगाव बु, निल्लोड, भराडी यांचा समावेश आहे. तर ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान होऊन पात्र ठरलेल्या गावात सिल्लोड व आमठाणा हे दोन मंडळ आहेत.बोंडअळीचे पंचनामे तालुका प्रशासनाने केले. सर्व आठ मंडळात ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा पातळीवर कृषी अधीक्षक कार्यालयात व जिल्हा अधिकाºयांना दिला. मात्र त्यात जिल्हा पातळीवर विविध निकष लावून केवळ सिल्लोड व आमठाणा या महसूल मंडळातील शेतकरी पात्र ठरवले गेले.जिल्हाधिकाºयांनी जाहीर केलेल्या यादीत सिल्लोडचे ३३.१३ टक्के, आमठाणा ३६.८४, अजिंठा २९.२७, बोरगाव बाजार १३.९१, अंभई १८.७, गोळेगाव बु. १७.०५, निल्लोड ६.४७, भराडी १.२३ टक्के नुकसान दाखविले आहे. ज्या गावात ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्या गावचे पंचनामे करून याद्या पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहेत.कोट......तर गंभीर परिणामसिल्लोड -सोयगाव तालुक्यात बोंडअळीमुळे सर्वत्र ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसा अहवाल तालुका प्रशासनाने पाठविला आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून ६ मंडळातील शेतकºयांना ३३ टक्यांच्या आत नुकसान दाखवून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने शेतकºयांची चेष्ठा करू नये. असे झाल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, शेतकºयांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.-आ. अब्दुल सत्तारशासन आदेशदोन हेक्तरपर्यंत जमीन धारण करणारे शेतकरी कोरडवाहू शेतकºयांना ६८०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे २ हेक्टरपर्यंत, किमान १ हजारापेक्षा कमी नाही. बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे किमान १ हजारापेक्षा कमी नाही. वरील प्रमाणे शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी दि. रा. बागणे यांनी शुक्रवारी प्रशासनास दिले आहेत.बदल कसा झाला, माहीत नाहीसिल्लोड तालुक्यातील सर्व ८ महसूल मंडळातील ७८ हजार ४९५ शेतकºयांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल आम्ही जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यात कसा बदल झाला, मी सांगू शकत नाही. पण या अहवालावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व माझ्या सह्या आहेत.- सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड