शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या मदतीत सिल्लोड तालुक्यावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:49 IST

श्यामकुमार पुरे सिल्लोड : तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाल्यानंतर जाहीर झालेल्या मदतीत तालुक्यातील सहा मंडळांवर अन्याय करण्यात आल्याने ...

श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाल्यानंतर जाहीर झालेल्या मदतीत तालुक्यातील सहा मंडळांवर अन्याय करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने हा अन्याय केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.बोंडअळीमुळे आलेले कापूस पीक हातचे गेले. याबाबत नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र पंतप्रधान पिकविमा योजना, चाचणी प्रयोग, मागील ५ वर्षांचे पीक कापणी प्रयोग, नमुना सॅम्पल पद्धत, सांख्यिकी आकडे असे विविध निकष लावून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील ६ महसूल मंडळे वगळली. यामुळे तालुक्यातील १८ हजार ७७५ शेतकरी पात्र ठरले आहे तर ५९ हजार ७२० शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. विविध निकष लावून वगळण्यात आलेल्या महसूल मंडळात अजिंठा, बोरगाव बाजार, अंभई, गोळेगाव बु, निल्लोड, भराडी यांचा समावेश आहे. तर ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान होऊन पात्र ठरलेल्या गावात सिल्लोड व आमठाणा हे दोन मंडळ आहेत.बोंडअळीचे पंचनामे तालुका प्रशासनाने केले. सर्व आठ मंडळात ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा पातळीवर कृषी अधीक्षक कार्यालयात व जिल्हा अधिकाºयांना दिला. मात्र त्यात जिल्हा पातळीवर विविध निकष लावून केवळ सिल्लोड व आमठाणा या महसूल मंडळातील शेतकरी पात्र ठरवले गेले.जिल्हाधिकाºयांनी जाहीर केलेल्या यादीत सिल्लोडचे ३३.१३ टक्के, आमठाणा ३६.८४, अजिंठा २९.२७, बोरगाव बाजार १३.९१, अंभई १८.७, गोळेगाव बु. १७.०५, निल्लोड ६.४७, भराडी १.२३ टक्के नुकसान दाखविले आहे. ज्या गावात ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्या गावचे पंचनामे करून याद्या पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहेत.कोट......तर गंभीर परिणामसिल्लोड -सोयगाव तालुक्यात बोंडअळीमुळे सर्वत्र ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसा अहवाल तालुका प्रशासनाने पाठविला आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून ६ मंडळातील शेतकºयांना ३३ टक्यांच्या आत नुकसान दाखवून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने शेतकºयांची चेष्ठा करू नये. असे झाल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, शेतकºयांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.-आ. अब्दुल सत्तारशासन आदेशदोन हेक्तरपर्यंत जमीन धारण करणारे शेतकरी कोरडवाहू शेतकºयांना ६८०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे २ हेक्टरपर्यंत, किमान १ हजारापेक्षा कमी नाही. बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे किमान १ हजारापेक्षा कमी नाही. वरील प्रमाणे शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी दि. रा. बागणे यांनी शुक्रवारी प्रशासनास दिले आहेत.बदल कसा झाला, माहीत नाहीसिल्लोड तालुक्यातील सर्व ८ महसूल मंडळातील ७८ हजार ४९५ शेतकºयांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल आम्ही जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यात कसा बदल झाला, मी सांगू शकत नाही. पण या अहवालावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व माझ्या सह्या आहेत.- सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड