शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीडित महिला व बालकांना मदत आणि पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 06:18 IST

खंडपीठाचे निर्देश; ‘मनोधैर्य योजने’बाबतचा नवीन निर्णय जारी करा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील पोक्सोअंतर्गतच्या सर्व पीडितांना लाभ मिळावा, यासाठी  ‘मनोधैर्य योजने’बाबतचा स्वयंस्पष्ट नवीन शासन निर्णय आदेशापासून चार आठवड्यात जारी करा, असे निर्देश खंडपीठाचे न्या. आर. डी.  धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी शुक्रवारी राज्य शासनास दिले आहेत.

या आदेशामुळे याचिकाकर्तीच्या पीडित मुलीसह राज्यातील सर्व बलात्कार पीडित, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसाहाय्य मिळण्याचा आणि त्यांचे पुनर्वसन होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. 

३० डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयापूर्वीच्या पीडितांना या योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट) लाभ दिला जात नव्हता. शासनाची ही कृती भेदाभेद करणारी आणि कुठलाही वाजवी आधार नसलेली आहे, असे निरीक्षण नोंदवीत वरील शासन निर्णयापूर्वीच्या आणि नंतरच्या सर्व पीडितांना योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या आदेशाचा पूर्तता अहवाल सादर करण्यासाठी १३ जून २०२२ रोजी सुनावणी ठेवून याचिका निकाली काढली. 

एका बलात्कार पीडितेच्या आईने  याचिका दाखल केली होती. सदर खटल्यात आरोपीला ११ डिसेंबर २०१७ रोजी  विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला होता. त्याच महिन्यात २० दिवसानंतर ३० डिसेंबर २०१७ रोजी  शासनाने पोक्सो कायद्यांतर्गतच्या पीडितांना ‘मनोधैर्य योजने’चा लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला होता. 

या योजनेचा लाभ याचिकाकर्तीच्या मुलीला मिळावा यासाठी तिने २०१८ आणि २०१९ साली केलेले अर्ज सदर पीडितेला या योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देता येणार नसल्याचे कारण दर्शवीत नामंज़ूर करण्यात आले होते. म्हणून त्यांनी ॲड. विशाल पी. बकाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

‘कृती भेदभाव करणारी’n ३० डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयापूर्वीच्या पीडितांना योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट) लाभ दिला जात नव्हता. n ही कृती भेदाभेद करणारी आणि कुठलाही वाजवी आधार नसलेली आहे, असे निरीक्षण नोंदवीत वरील निर्णयापूर्वीच्या व नंतरच्या पीडितांना योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.