शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

जड वाहतूक वळविली तर टळेल कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:45 IST

बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पाहणी करणे, मागणी करणे, आदेश देणे आणि श्रेयाचे ढोल बडविण्यापलिकडे काहीही झालेले नसल्यामुळे कोणालाच देणे-घेणे नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.बिंदूसरा नदीवरील मोठा पूल आणि पर्यायी पूल याचे त्रांगडे दोन वर्षांपासून कायम आहे. त्याचबरोबर शहरातून जाणाºया दगडी पुल, नवा पूल आणि अमरधाम लगतच्या पुलाकडेही स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच सतर्कतेचा इशारा दिला जातो. नंतर मात्र सर्वच विसरून जातात. दोन दिवसांपुर्वी बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी काही प्रमाणात ओसरले असलेतरी येणाºया कालावधीत मोठा पाऊस या भागात झाला तर पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तयार होणाºया पर्यायी पुलाचे काम किती दिवस टिकेल याबद्दल तर्क- वितर्क लढविले जात आहे.रिंंग रोड कागदावरचगत दोन महिन्यापूर्वी पावसामुळे बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल खचला होता. त्यानंतर आयआरबी कंपनीने जिल्हा प्रशासनाला ४५ दिवसांत रिंग रोड तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. दोन महिने उलटूनही रिंग रोडबद्दल साधी चर्चाही झाली नाही. हा रोड कागदावरच राहिला.तसेच बायपासचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे अश्वासनही कागदावरच राहिले आहे. याचा पाठपुरावा करण्यास जिल्हा प्रशासनही उदासीन असल्याचा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला आहे.मिनी बायपास पक्का करामिनी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण केल्यास या मार्गानेही जड वाहतूक वळविता येऊ शकते. सध्या काही प्रमाणात कच्चा रस्ता असलातरी मिनी बायपास मार्गाने वाहतूक वळविण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीने होत आहेत. त्यामुळे जालना रोड मोकळा श्वास घेत आहे.जालना- औरंगाबादकडून येणारी जड वाहने गढीपासून वळविण्यात येत आहेत. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित क्षेत्रातील ठाण्यांकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच दक्षतेने काम करण्याचे निर्देश वरिष्ठांनी देण्याची गरजआहे.