शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतूक वळविली तर टळेल कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:45 IST

बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पाहणी करणे, मागणी करणे, आदेश देणे आणि श्रेयाचे ढोल बडविण्यापलिकडे काहीही झालेले नसल्यामुळे कोणालाच देणे-घेणे नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.बिंदूसरा नदीवरील मोठा पूल आणि पर्यायी पूल याचे त्रांगडे दोन वर्षांपासून कायम आहे. त्याचबरोबर शहरातून जाणाºया दगडी पुल, नवा पूल आणि अमरधाम लगतच्या पुलाकडेही स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच सतर्कतेचा इशारा दिला जातो. नंतर मात्र सर्वच विसरून जातात. दोन दिवसांपुर्वी बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी काही प्रमाणात ओसरले असलेतरी येणाºया कालावधीत मोठा पाऊस या भागात झाला तर पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तयार होणाºया पर्यायी पुलाचे काम किती दिवस टिकेल याबद्दल तर्क- वितर्क लढविले जात आहे.रिंंग रोड कागदावरचगत दोन महिन्यापूर्वी पावसामुळे बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल खचला होता. त्यानंतर आयआरबी कंपनीने जिल्हा प्रशासनाला ४५ दिवसांत रिंग रोड तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. दोन महिने उलटूनही रिंग रोडबद्दल साधी चर्चाही झाली नाही. हा रोड कागदावरच राहिला.तसेच बायपासचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे अश्वासनही कागदावरच राहिले आहे. याचा पाठपुरावा करण्यास जिल्हा प्रशासनही उदासीन असल्याचा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला आहे.मिनी बायपास पक्का करामिनी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण केल्यास या मार्गानेही जड वाहतूक वळविता येऊ शकते. सध्या काही प्रमाणात कच्चा रस्ता असलातरी मिनी बायपास मार्गाने वाहतूक वळविण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीने होत आहेत. त्यामुळे जालना रोड मोकळा श्वास घेत आहे.जालना- औरंगाबादकडून येणारी जड वाहने गढीपासून वळविण्यात येत आहेत. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित क्षेत्रातील ठाण्यांकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच दक्षतेने काम करण्याचे निर्देश वरिष्ठांनी देण्याची गरजआहे.