शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

जड वाहतूक वळविली तर टळेल कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:45 IST

बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पाहणी करणे, मागणी करणे, आदेश देणे आणि श्रेयाचे ढोल बडविण्यापलिकडे काहीही झालेले नसल्यामुळे कोणालाच देणे-घेणे नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.बिंदूसरा नदीवरील मोठा पूल आणि पर्यायी पूल याचे त्रांगडे दोन वर्षांपासून कायम आहे. त्याचबरोबर शहरातून जाणाºया दगडी पुल, नवा पूल आणि अमरधाम लगतच्या पुलाकडेही स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच सतर्कतेचा इशारा दिला जातो. नंतर मात्र सर्वच विसरून जातात. दोन दिवसांपुर्वी बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी काही प्रमाणात ओसरले असलेतरी येणाºया कालावधीत मोठा पाऊस या भागात झाला तर पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तयार होणाºया पर्यायी पुलाचे काम किती दिवस टिकेल याबद्दल तर्क- वितर्क लढविले जात आहे.रिंंग रोड कागदावरचगत दोन महिन्यापूर्वी पावसामुळे बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल खचला होता. त्यानंतर आयआरबी कंपनीने जिल्हा प्रशासनाला ४५ दिवसांत रिंग रोड तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. दोन महिने उलटूनही रिंग रोडबद्दल साधी चर्चाही झाली नाही. हा रोड कागदावरच राहिला.तसेच बायपासचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे अश्वासनही कागदावरच राहिले आहे. याचा पाठपुरावा करण्यास जिल्हा प्रशासनही उदासीन असल्याचा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला आहे.मिनी बायपास पक्का करामिनी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण केल्यास या मार्गानेही जड वाहतूक वळविता येऊ शकते. सध्या काही प्रमाणात कच्चा रस्ता असलातरी मिनी बायपास मार्गाने वाहतूक वळविण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीने होत आहेत. त्यामुळे जालना रोड मोकळा श्वास घेत आहे.जालना- औरंगाबादकडून येणारी जड वाहने गढीपासून वळविण्यात येत आहेत. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित क्षेत्रातील ठाण्यांकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच दक्षतेने काम करण्याचे निर्देश वरिष्ठांनी देण्याची गरजआहे.