शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

विजांच्या कडकडाटात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:25 IST

शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व पाऊस : कापणी केलेल्या उन्हाळी धानपिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. आज २८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.भंडारा जिल्ह्यातील तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी, वरठी, अड्याळ या परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने १ जूनपासून आतापर्यंत ५२.१ मिमी पावसाची नोंद केली आहे. शुक्रवारला रात्री ९ वाजता पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर रात्री रिमझीम पाऊस आणि पहाटे बंद झाला. परंतु सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला.या अचानक बरसलेल्या पावसामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकºयांनी धानाची कापणी करून धान शेतात ठेवले होते. ते धान पावसामध्ये भिजल्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे नुकसान लाखांदूर तालुक्यात अधिक प्रमाणात झाले आहे. दरम्यान, पहिल्याच पावसाने पालिकेची पोल खोलली आहे. नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. त्यातील कचरा रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. याचा फटका वाहनचालकांना झाला. मान्सुनपूर्व नाल्यांची सफाई न केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.लाखांदुरात धान पीक पाण्याखालीलाखांदूर : उन्हाळी धानाची रोवणीनंतर मे, जून महिन्यात कोरड्या पडणाºया विहिरींना यावर्षी बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे धान पीक चांगले आले. परंतु कापणी करून ठेवलेले बहुतांश शेतकºयांचे धान रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांनी कापणीनंतर धानाची मळणी केली त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळणार आहे. उन्हाळी धानाची रोवणी केल्यानंतर धानपिकाला कीडीने ग्रासले होते. अशातच शेतकऱ्यांनी उसनवार आणि व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. सततची नापिकी आणि नैसर्गिक प्रकोपाने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी चांगले धानपीक हाती येईल, अशी आशा होती. धान पिकले तर कर्जाचा भार कमी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु लाखांदूर तालुक्यातील काही भागात जलस्तर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. विविध उपाययोजना करून उत्पादन घेतले. मात्र अचानक बरसलेल्या पावसामुळे कापणीसाठी आलेल्या धानाला फटका बसला आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकºयांच्या शेतात कापणीसाठी असलेले उभे धानपिक पाण्याखाली सापडले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहेत.पालांदूर परिसरात पावसाची रिपरिपपालांदूर : जिल्ह्यात काही भागात दोन तीन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी पालांदूर परिसरात मात्र अजूनही चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. कृषी केंद्रात शेतकऱ्यांना अपेक्षित बियाणांची टंचाई जाणवत आहे. संकरीत वाणाला मागणी वाढत आहे. ढगाळ वातावणामुळे तापमान कमी झाले आहे. घर दुरूस्तीच्या कामाला गती आली आहे. पावसाच्या जोरदार हजेरीनंतर पेरणीला गती मिळण्याची चिन्हे आहेत. अनुदानावरील बियाणाने शेतकºयाला आधार मिळाला असला तरी बियाणे अपुरे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.खरिपाच्या मशागतीला प्रारंभपवनी : यावर्षी खरीपाच्या मशागतीला लवकरच प्रारंभ झाला आहे. मागील काही वर्षांपासून पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. कधी अवर्षन तर कधी दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी होरपळत आहे. दरम्यान यावर्षी तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली तर पीक हाती येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना पावसाने हजेरी लावली आहे. पवनी आणि लाखांदूर या चौरास भागात उन्हाळी धानपिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी हे धानपिक बºयापैकी आले असताना आता पावसाने हजेरी लावल्याने कापनी केलेले धान ओलेचिंब झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस