शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

आरोग्याकडे होतोय तरुणांचा कानाडोळा !

By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : शहरातील २५ ते ४० या वयोगटातील सुमारे ३९ टक्के तरुणांना कोणत्या ना कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते.

उस्मानाबाद : शहरातील २५ ते ४० या वयोगटातील सुमारे ३९ टक्के तरुणांना कोणत्या ना कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते. नियमित व्यायामाचा अभाव आणि आरोग्याकडेही दुर्लक्ष केल्याने ही तरुणाई आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे मधुमेह आणि रक्तदाब या आजारांना चाळीशीच्या आतच सामोरे जावे लागत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.मागील काही वर्षात आहाराबरोबरच एकूणच जीवन पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. सर्वच क्षेत्रात चुरस वाढल्याने या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ही तरुणाई दिवसरात्र धडपडत असते. अशावेळी आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. त्याचेच परिणाम चाळीशीच्या आतच भोगावे लागत असल्याचे या सर्वेक्षणावरुन स्पष्ट होत आहे. ‘आपणास कोणत्या आजाराला सामोरे जावे लागत आहे’ असा प्रश्न ‘लोकमत’ने प्रश्नावलीच्या माध्यमातून २५ ते ४० या वयोगटातील तरुणांना विचारला होता. ६१ टक्के तरुणांनी कोणताही मोठा आजार नसल्याचे सांगितले असले तरी सर्दी, पडसे, पाठदुखी सारखा त्रास कधी-कधी जाणवतो, असे यावेळी सांगितले. १८ टक्के तरुणांनी मधुमेहाचा आजार असल्याचे नमूद केले. तर १३ टक्के जणांनी रक्तदाब असल्याचे सांगत, इतर ८ टक्के तरुणांनीही इतर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे या सर्वेक्षणावेळी स्पष्ट केले.ऐन तरुण वयात आजाराच्या विळख्यात ही तरुणाई सापडत असून, आरोग्याची योग्य काळजीही घेतली जात नसल्याचे यावेळी पुढे आले.आजार होवू नये आणि एखाद्या आजाराची लागण झाली ुअसेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. मात्र अनेकजण याकडेही कानाडोळा करीत असल्याचे या सर्वेक्षणावेळी स्पष्ट झाले. सर्वेक्षण केलेल्यातील ५६ टक्के तरुणांनी मागील आरोग्य तपासणी नेमकी केंव्हा केली हे आठवत नसल्याचे सांगितले. २३ टक्के तरुणांनी आरोग्य तपासणी करुन सहा महिने झाले असतील असे सांगितले. १७ टक्के तरुणांनी तीन महिन्यापूर्वी डॉक्टरांकडे गेलो होतो असे नमूद केले. तर ४ टक्के तरुणांनी चालू महिन्यातच आरोग्य तपासणी केल्याचे सर्वेक्षणावेळी सांगितले. आपल्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवेबाबतही ही तरुणाई काहीशी नाखूष असल्याचेच या सर्वेक्षणावेळी दिसून आले. ३६ टक्के तरुणांनी आरोग्य सेवेचा दर्जा चांगला असल्याचे म्हटले असले तरी ४३ टक्के तरुणांनी मात्र त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नसल्याचेच एकप्रकारे नमूद केले आहे. तर २१ टक्के तरुणांनी आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत काहीहीसांगता येत नसल्याचे म्हटले आहे. (जि.प्र.)मागील काही वर्षात उस्मानाबाद शहरात आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला आहे. खाजगी रुग्णालयाबरोबरच शासकीय रुग्णालयातही तज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. मात्र तरीही जिल्ह्याबाहेरील शेजारच्या शहरात जावून उपचार करणाऱ्यांची संख्या तब्बल ७ टक्के असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एखादा आजार उद्भवल्यास शहरातील खाजगी रुग्णालयाला प्राधान्य देणाऱ्या तरुणांची संख्या ५८ टक्के असल्याचे दिसून आले. तर ३५ टक्के तरुण शहरातील शासकीय रुग्णालयाला प्राधान्य देत असून, ७ टक्के तरुणांनी मात्र जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे सांगितले. चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा असा सल्ला वडिलधाऱ्यांसह सर्वचजण तरुणांना देत असतात. अनेकजण भल्या पहाटे व्यायाम तसेच जॉगींगसाठी घराबाहेर पडत असले तरी तब्बल ४९ टक्के तरुणांचे व्यायामसह आहार आणि इतर बाबींकडेही दुर्लक्ष असल्याचे या सर्वेक्षणावेळी दिसून आले. २१ टक्के तरुणांनी आपण नियमित व्यायाम करतो असे सांगितले. तर १२ टक्के तरुणांनी आहाराच्या दर्जाबरोबरच जेवणाच्या वेळाही पाळतो असे नमूद केले. विशेष म्हणजे आपल्याला कसलेही व्यसन नाही असे सांगणाऱ्या तरुणांची संख्या अवघी १८ टक्के असल्याचे या सर्वेक्षणावेळी स्पष्ट झाले.