शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

औरंगाबाद जिल्ह्यात शेतीतील मातीचे आरोग्य बिघडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:34 IST

शेतीचा डॉक्टर :  मातीचा पोत खालावल्याचे तपासणीतून सिद्ध झाले.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. तसेच भरघोस आणि दर्जेदार पिकांच्या उत्पादनासाठी माती सुपीक असणे आवश्यक आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात नेमके उलटे घडत आहे. येथील शेतीतील मातीचे आरोग्य खालावल्याचे समोर आले आहे. रासायनिक खतांचा चुकीच्या पद्धतीने वापर व एकच पीक वारंवार घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हा परिणाम झाला आहे. 

औरंगाबाद कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान जिल्हाभरातून आलेले मातीचे ६१ हजार ९९५ नमुने तपासण्यात आले. यात मातीतील आम्लविम्ल निर्देशांक (सामू), क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज व तांबे या १२ घटकांची तपासणी करण्यात आली. पीक वाढीसाठी चांगल्या जमिनीत ०.८० च्या वर सेंद्रिय कर्बचे प्रमाण आवश्यक आहे. यात कन्नड व औरंगाबाद तालुक्यातील काही गावांत ०.९० ते १ पेक्षा अधिक सेंद्रिय कर्बचे प्रमाण आढळून आले. तर वैजापूर व गंगापूरमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण ०.४० ते ०.६० आहे. शिवाय क्षारतेचे प्रमाण या दोन तालुक्यात जास्त आढळून आले. त्यामुळे येथील मातीचा पोत अन्य तालुक्यांपेक्षा जास्त खालावल्याचे तपासणीतून सिद्ध झाले.

सेंद्रिय खताचा वापर होतो तेथील मातीचा पोत सुधारत आहे.  साधारण ७.५० ते ८.२० दरम्यान क्षाराचे प्रमाण हवे असते. ते वाढले आहे. सेंद्रिय कर्ब कमी असल्याने नत्रचे प्रमाण कमी आहे. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे.  रासायनिक खतांचा अति व चुकीचा वापर टाळणे. तसेच सुपीक जमिनीसाठी गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक खते आदी सेंद्रिय घटकांच्या वापरातून सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. एकच पीक वारंवार घेणे टाळायला हवे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी