शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आरोग्य सेवाच ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:41 IST

आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देउपचारासाठी भटकंती : शासकीय रुग्णालयांची अपुऱ्या सुविधांच्या जोरावर रुग्णसेवा, खाजगी रुग्णालयांचा विस्तार

(जागतिक आरोग्य दिन विशेष)औरंगाबाद : आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत. कारण आरोग्य सेवाच सध्या ‘आजारी’ आहे. आरोग्याप्रती नागरिकांत जागरुकता वाढली. मात्र, शासकीय रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा या दिनाचे घोषवाक्य ‘सर्वांसाठी आरोग्य : प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी’ हे आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३ उपजिल्हा रुग्णालये, ११ ग्रामीण रुग्णालये, औरंगाबादेत मिनी घाटी म्हणजे चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. शहरात महापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. छावणी रुग्णालय आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. आरोग्य सेवेचे एवढे मोठे जाळे आहे. परंतु या सर्वांना अपुरा निधी, अपुºया सोयी-सुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत असून, उपचारासाठी इकडून तिकडे जाण्याची नामुष्की ओढावत आहे. या सगळ्यात खाजगी रुग्णालयांचा विस्तार झपाट्याने होत आहे.ग्रामीण रुग्णांना सरळ रेफरग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, रुग्णालयांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे सरळ शहरात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत प्रसूतीसाठी ४० टक्क्यांवर गरोदर माता या ग्रामीण भागांतून येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात २२० पैकी केवळ ८० खाटांद्वारे रुग्णसेवा दिली जात आहे. ओपीडी आणि केवळ दोन आंतररुग्ण वॉर्ड याठिकाणी आजघडीला सुरू आहेत.मनपाची फक्त ओपीडी सेवामहापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोग्य केंद्रांच्या ओपीडीत ४ लाख ३३ हजार २६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर आंतररुग्ण विभागात अवघ्या १ हजार २६८ रुग्णांवर उपचार झाले. यात प्रसूतींची संख्याही केवळ ३७० आहे. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात होणाºया प्रसूतीची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. अशा सगळ्यात मनपाच्या केंद्रांतूनही गंभीर रुग्णांसह छोट्या-छोट्या आजारांसाठी घाटीत रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे.‘घाटी’ची कसरतघाटीत गतवर्षी ओपीडीत ६ लाख ५१ हजार तर आयपीडीत ९८ हजार रुग्णांवर उपचार झाले. वर्षभरात १८ हजार प्रसूती झाल्या. एकूण ११७७ खाटा असताना १२०० ते १५०० रुग्ण दाखल होतात. त्यातून अनेकांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोयी-सुविधा अपुºया पडतात. रुग्णालयाला प्रतिजैविके, अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन, मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरापासून एक सिटी स्कॅन बंद आहे. कॅ थलॅब बंद आहे. अनेक व्हेंटिलेटर बंद आहेत. वर्षभरात फक्त १० नवीन यंत्रे आली.रुग्णांचा कलचांगल्या दर्जाच्या सेवा ज्याठिकाणी मिळतात, त्याठिकाणी जाण्याकडे रुग्णांचा कल असतो. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हेल्थ वेलनेस क्लिनिकची संकल्पना सुरू केली आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालकअधिक चांगली सेवाआरोग्य विभाग, महापालिकाची यंत्रणा सक्षम झाली तर घाटीत रेफर होण्याचे प्रमाण कमी होईल आणि टर्शरी केअर सेंटर म्हणून रुग्णालय अधिक नावारुपाला येईल. सुपर स्पेशालिटी विभाग, एमसीएच विंग, शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्ताराने रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळेल.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)सर्वांनी एकत्र काम करावेआरोग्य सेवा मिळणे, हा सर्वांचा हक्क आहे. शासकीय आणि खाजगी सेवांनी नागरिकांना योग्य आणि वेळेत आरोग्य सेवा दिल्या पाहिजे. सर्वांनी आपापल्या स्तरावर आणि सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा दिली पाहिजे.- डॉ. निता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा ------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य