शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

लॉकडाऊनपेक्षा गड्या आपला गाव बरा; अनेक मजूर, कामगारांनी धरली गावाकडची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:42 IST

corona virus in Aurangabad ब्रेक दि चेन मिशन सुरू झाले असून, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूवगळता हॉटेल, कापड व्यवसाय, पॅकेजिंग अशा अनेक आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : मागील लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय व छोट्या खेड्यातील कामगारांचे हाल झाले. करमाडजवळ झालेल्या अपघातात २० मजुरांचा बळी गेल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे लॉकडाऊन झाल्याने हॉटेल व दुकाने बंद असल्याने कामगारांचे हातचे काम गेले आहे. उपाशीपोटी राहण्यापेक्षा गावाकडे जाणे पसंत केले आहे.

ब्रेक दि चेन मिशन सुरू झाले असून, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूवगळता हॉटेल, कापड व्यवसाय, पॅकेजिंग अशा अनेक आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अधिक लोकांची गर्दी होऊन पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने जिल्हा हादरून गेला आहे. पूर्वी ज्येष्ठांनाच कोरोनाचा धोका होता; परंतु आता बालकांपासून ते ज्येष्ठापर्यंत कोरोना विळखा वाढत चालला आहे. लॉकडाऊन झाले असले तरी कुणाच्याही मदतीचे हात पुढे आले नाहीत. खोली भाडे द्यायचे कसे आणि खायचे काय, निर्बंध आणखी कडक केल्यास शहरात राहणे कठीण होणार आहे. खानावळी बंद असल्याने जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हळूहळू स्थलांतर होत आहे.

संचारबंदीत एकाच ठिकाणी जास्तीचे लोक जमू नये, दंडात्मक कारवाई केली जात असल्याने हातचे काम गेलेले कामगार शहरातून काढता पाय घेतला दिसत आहेत. बांधकाम व्यावसायिकांचे काम सुरू असल्याने मजूर तेथे कामावर आहेत. कारखान्यातही दररोज तपासणी करून कामगारांना कामावर रुजू करून घेतात. कॉर्पोरेट सेक्टरची बहुतांश कामे घरूनच सुरू असल्याचे चित्र आहे. परंतु हॉटेल, दुकान व स्टेशनरी तसेच इतर व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कामगारांना शहर सोडल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

लांब पल्ल्याच्या गाड्यासह जवळच्या गावाकडेही ओढा...लॉकडाऊनमध्ये अजून कडक निर्बंध लागल्यास खाण्यापिण्याचे वांदे होणार आहे. या भीतीने आणि गतवर्षीच्या अनुभवावरून काढता पाय घेण्यावर कामगारांचा भर आहे. बांधकाम व्यवसायातही म्हणावी तशी कामाला संधी नाही, मोजकेच मजूर कामावर टिकून आहेत. हातचे काम जाण्याच्या भीतीने कामगार ते टिकविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मजुरांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्नही भेडसावत आहे. हॉटेल व्यवसाय तसेच खानावळीत काम करणाऱ्यांना बांधकामावर जाण्याची वेेळ आली आहे. आठ दिवस काम मिळेल याची खात्री नसल्याने व खोलीभाडे देणे कठीण झालेले आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अनेकजण वाट पाहत आहेत.

लॉकडाऊनने काम बंद, खायचे काय...टाॅवरचे काम करण्यासाठी दहा ते वीस लोकांचा ग्रुप होता. परंतु लॉकडाऊन लागल्याचे जाहीर झाले आणि गत वर्षीसारखे अडकून पडायचे नाही. त्यामुळे गावाकडचे घर गाठणे पसंत केले. कुटुंबात राहून अर्धपोटी जगता येईल. परंतु बाहेरून कुटुंबाला काय मदत करणार, असा प्रश्न आहे.- सलिम बेग

मजुरांची तारांबळ वाढली...लॉकडाऊनमुळे मोठ्या व्यावसायिकांच्या साइट बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. सध्या जगण्याची चिंता भेडसावू लागली आहे. कारखान्यातून जीवनाश्यक वस्तूंच्या मालाची ने-आण होत आहे. इतर मालाच्या गाड्या भरत नाहीत, त्यामुळे मजुरांची संख्याही रोडावली आहे.- शुभम भारसाखळे 

हॉटेल व्यवसाय बंद झाले..शहरातील विविध मुलांच्या हाताला काम देणारा हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगार वाढले आहेत. कारखान्यात हमाली व इतर काम कठीण वाटते. त्यामुळे बहुतांश मुलांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पोटासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी आहे.- प्रशांत बनकर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद