शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

मुख्याध्यापकांच्या चुका, विद्यार्थ्यांना फटका !

By admin | Updated: February 4, 2016 00:35 IST

उस्मानाबाद : एकीकडे अतिरिक्त शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने करीत आहेत, तर दुसरीकडे पाचवी, आठवीच्या वर्गांना एकेक वर्ष शिक्षक मिळत नाहीत.

उस्मानाबाद : एकीकडे अतिरिक्त शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने करीत आहेत, तर दुसरीकडे पाचवी, आठवीच्या वर्गांना एकेक वर्ष शिक्षक मिळत नाहीत. हा सर्व गुंता २०१५-१६ ची संचमान्यता नसल्यामुळे वाढला होता. पाच-सहा दिवसांपूर्वी संचमान्यताही आली. परंतु, येथेही माशी शिंकली. जिल्हाभरातील जवळपास १०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी वर्गखोल्यांची संख्याच कमी दर्शविली. त्यामुळे त्यामुळे शिक्षकांची अपेक्षित पदे मंजूर होऊ शकली नाहीत. मुख्याध्यापकांच्या या दुर्लक्षित कारभारामुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अन् निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. असे असतानाच तीन-चार वर्षांपूर्वी निमशिक्षकांनाही जिल्हा परिषद शाळेवर नियुक्ती देण्याबाबत शासनाने आदेश काढले. परंतु, जिल्हा परिषदेकडे रिक्त पदे निसल्याने हा प्रश्न वर्षागणिक जटील बनत गेला. असे असतानाच दुसरीकडे शिक्षक नाहीत, म्हणून नव्याने सुरू करण्यात आलेले पाचवी आणि आठवीचे वर्ग जवळपास ओस पडले आहेत. पदे मंजूर नसल्याने या वर्गांना शिक्षक देता येत नव्हते. त्यामुळे सातत्याने आंदोलने होत असत. त्यावर शिक्षण विभागाकडूनही ‘२०१५-१६ च्या संचमान्यता आल्यानंतर नियुक्ती देवू’, हे ठरलेले आश्वासन दिले जात असे. महत प्रतीक्षेनंतर म्हणजेच पाच-सहा दिवसांपूर्वी सदरील संचमान्यता आली. त्यामुळे सर्वांच्याच आशा उंचावल्या होत्या. परंतु, जिल्हाभरातील सुमारे १०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘सरल’ प्रणालीमध्ये वर्गखोत्यांची अचूक माहिती न भरल्यामुळे अपेक्षित पदे मंजूर होवू शकली नाहीत. कारण ‘आरटीई’नुसार एका वर्गासाठी एक शिक्षक दिला जातो. मात्र, उपरोक्त मुख्याध्यापकांनी वर्गखोल्या आहेत, त्यापेक्षा कमी दाखविल्या आहेत. त्यामुळे सहाजीकच मंजूर शिक्षकांची पदेही कमी झाली आहेत. त्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांसोबतच जिल्हाभरातील अतिरिक्त गुरूजी आणि निमशिक्षकांनाही सोसावा लागत आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर शिक्षण विभागाकडून झालेल्या चुकांची दुरूस्ती करण्याबाबत संबंधितांना आदेशित केले आहे. त्यानुसार प्रक्रियाही करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्याने सादर करण्यात येणाऱ्या सदरील माहितीला शासनाकडून किती दिवसांत हिरवा कंदिल मिळणार? याचे उत्तर ना अधिकाऱ्यांकडे आहे, ना संबंधित मुख्याध्यापकांकडे. दरम्यान, शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षित कारभाराकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी लक्ष देण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)