शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विभागप्रमुखांचे ‘करार’ मोडीत

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील विभागांमध्ये सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये परस्पर विनापरवाना सामंजस्य करार करण्याची सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. काळे यांनी कामकाजाची पद्धत समजावून घेतली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, विद्यापीठातील अनेक शैक्षणिक विभागांमध्ये व्यवस्थापन परिषदेची पूर्वपरवानगी न घेताच काही उद्योग, स्वायत्त संस्था, खाजगी संस्थांसोबत सामंजस्य करार केले जातात. बहुतांशी विभागांत झालेले करार हे निव्वळ प्रासंगिक ठरलेले आहेत. विद्यापीठात होणाऱ्या सामंजस्य कराराबाबत एकवाक्यता असावी, या हेतूने ‘बीसीयूडी’च्या संचालकांनी एक परिपत्रकच काढले असून ते कुलसचिव, विद्यापीठाचे उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे संचालक व सर्व विभागांना जारी केले आहे. विद्यापीठ कायद्यान्वये विद्यापीठ, महाविद्यालये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिसंस्था, वैज्ञानिक, औद्योगिक, वाणिज्य संघटना यांच्यामध्ये सहयोग वृद्धिंगत करण्यासाठी तसेच त्याला चालना देण्यासाठी ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांनाच अधिकार असेल. कलम १७ (७) अन्वये विद्यापीठ प्राधिकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून कुलसचिव यांना विद्यापीठाच्या वतीने करार करण्याच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असेल. सामंजस्य करार करण्यासंदर्भात विद्यापीठात ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीे. समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे २ सदस्य, दोन विभागांतील प्राध्यापक व विद्याशाखेचा अधिष्ठाता यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागाने समितीच्या शिफारशी व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय परस्पर कसलाही सामंजस्य करार करू नये. विनापरवानगी करार केल्यानंतर एखादा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल.