शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

विभागप्रमुखांचे ‘करार’ मोडीत

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील विभागांमध्ये सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये परस्पर विनापरवाना सामंजस्य करार करण्याची सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. काळे यांनी कामकाजाची पद्धत समजावून घेतली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, विद्यापीठातील अनेक शैक्षणिक विभागांमध्ये व्यवस्थापन परिषदेची पूर्वपरवानगी न घेताच काही उद्योग, स्वायत्त संस्था, खाजगी संस्थांसोबत सामंजस्य करार केले जातात. बहुतांशी विभागांत झालेले करार हे निव्वळ प्रासंगिक ठरलेले आहेत. विद्यापीठात होणाऱ्या सामंजस्य कराराबाबत एकवाक्यता असावी, या हेतूने ‘बीसीयूडी’च्या संचालकांनी एक परिपत्रकच काढले असून ते कुलसचिव, विद्यापीठाचे उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे संचालक व सर्व विभागांना जारी केले आहे. विद्यापीठ कायद्यान्वये विद्यापीठ, महाविद्यालये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिसंस्था, वैज्ञानिक, औद्योगिक, वाणिज्य संघटना यांच्यामध्ये सहयोग वृद्धिंगत करण्यासाठी तसेच त्याला चालना देण्यासाठी ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांनाच अधिकार असेल. कलम १७ (७) अन्वये विद्यापीठ प्राधिकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून कुलसचिव यांना विद्यापीठाच्या वतीने करार करण्याच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असेल. सामंजस्य करार करण्यासंदर्भात विद्यापीठात ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीे. समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे २ सदस्य, दोन विभागांतील प्राध्यापक व विद्याशाखेचा अधिष्ठाता यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागाने समितीच्या शिफारशी व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय परस्पर कसलाही सामंजस्य करार करू नये. विनापरवानगी करार केल्यानंतर एखादा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल.