शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मागेल त्याला मिळेल प्रवेश

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

औरंगाबाद : वय ६ ते १४ वर्षे वयोगटातील कोणताही बालक शाळेपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात मागेल त्याला प्रवेश दिला जाईल.

 औरंगाबाद : वय ६ ते १४ वर्षे वयोगटातील कोणताही बालक शाळेपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात मागेल त्याला प्रवेश दिला जाईल. त्यासाठी शाळांमधून जागाही भरपूर असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, या कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळांना प्रवेश नाकारता येणार नाही. शैक्षणिक वर्षात केव्हाही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. दि.१६ जून २०१४ रोजी शाळा सुरू होणार असून, नव्या शैक्षणिक सत्रास प्रारंभ होईल. शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी प्रवेश सुरू करावा. पालकांनी काही निवडक शाळांचा आग्रह धरू नये, असे सांगून देशमुख म्हणाले, जिल्ह्यात ३,८९३ शाळा असूनही पालकांची ओढ फक्त निवडक ३० ते ३५ शाळांकडे असते, त्यामुळे प्रवेशाच्या अडचणी निर्माण होतात. तरीही प्रवेशासंदर्भात अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पाचवीचे ७७७, आठवीचे ३२६ वर्ग शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्ग जोडण्यात येत असून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवीचे ७७७ आणि आठवीचे ३२६ वर्ग सुरू करण्याची परवानगी शिक्षण आयुक्तांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेला दिली आहे. आरटीईनुसार पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत आणि सहावी ते आठव्या इयत्तेतील मुलांना तीन किलोमीटर परिघाच्या आत शाळा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा संख्या व व्यवस्थापन शासकीय व स्वायत्त संस्था 2,238 खासगी अनुदानित 747 विनाअनुदानित 908 मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीची विद्यार्थी संख्या - ८ लाख ४९ हजार १५६ (इयत्ता पहिली ते बारावी) मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या- ६ लाख ६६ हजार ५६१ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी संख्या -९१ हजार ४७९ उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्या -८७ हजार १५२ हिंदी माध्यमातील विद्यार्थी संख्या -३ हजार ९६४ जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची संख्या -२६ हजार ४५६