शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

हवालदिल झाले नागरिक

By admin | Updated: June 1, 2014 00:55 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये बोगस मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरून घेणारे रॅकेट असल्याचे ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले.

 औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये बोगस मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरून घेणारे रॅकेट असल्याचे ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यामुळे शहरातील दीड लाखाहून अधिक मालमत्ताधारक हवालदिल झाले आहेत. या रॅकेटमुळे आपली तर फसवणूक झाली नसेल ना, अशी शंका नागरिकांना येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयाने मनपाला सर्व वॉर्ड कार्यालयांमधील वसुलीचे त्रयस्त संस्थेकडून लेखापरीक्षण करावे, अशी सूचना केली. मनपा प्रशासनाने सूचनेला केराची टोपली दाखविली. महापालिकेच्या वॉर्ड ‘फ’ कार्यालयामधील काही कर्मचारी मालमत्ताधारकांना संगणकाच्या बोगस पावत्या देत असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही मनपाच्या वेगवेगळ्या वॉर्ड कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे उघडकीस आले आहेत. दरवेळी मनपा प्रशासन दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठीशी घालते. वॉर्ड ‘ई’ कार्यालयात मालमत्ता, पाणीपट्टी वसुलीच्या पैशात अफरातफर करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मनपातील मुख्य लेखापरीक्षक मो.रा. थत्ते व त्यांच्या सहकार्‍यांनी वॉर्ड ‘ई’ कार्यालयाची सविस्तर चौकशी केली असता २००६ ते २०१२ पर्यंत सहा वर्षांचा कुठेच हिशेब लागत नव्हता. थत्ते यांनी आपल्या २७ पानांच्या अहवालात मनपाच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये वसुलीच्या नावावर होणार्‍या गैरव्यवहारावर सविस्तर प्रकाश टाकला होता. महापालिकेच्या सहा वॉर्ड कार्यालयांमध्ये राहणारे बहुतांश नागरिक प्रामाणिकपणे पैसे भरतात; पण कर्मचारी हा पैसा मनपाच्या तिजोरीपर्यंत जाऊच देत नाहीत. कर्मचार्‍यांकडून होणार्‍या घोटाळ्यांना आळा बसावा म्हणून वसुलीचे काम दोन वर्षांपूर्वी आॅनलाईन करण्यात आले. त्यातही कर्मचार्‍यांनी शक्कल लढवून बोगस संगणकीय पावत्या छापून घेतल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते पाटील यांनी २० सप्टेंबर २०१३ रोजी विभागीय आयुक्तांना पत्र लिहून मनपाच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये होणार्‍या घोटाळ्याची माहिती दिली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी मनपाला कारवाईचे आदेश दिले होते. मनपाने आजपर्यंत दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. दाते यांनी विभागीय आयुक्तांकडे मागणी केली होती की, सर्व वॉर्ड कार्यालयांचे लेखापरीक्षण त्रयस्त संस्थेकडून करण्यात यावे. दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांचा समावेश होता. लेखापरीक्षकाचे ताशेरे मागील वर्षीच मनपाच्या लेखापरीक्षकांनी वॉर्ड ‘ई’ कार्यालयात तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. त्यात पावतीच्या आधारे नागरिकांकडून मालमत्ता, पाणीपट्टी वसूल केल्या जाते. भांडार विभागातून घेतलेल्या पावती पुस्तकांचा वॉर्ड कार्यालयात कुठेच मेळ लागत नाही. पावती पुस्तकाची प्रतच वॉर्ड कार्यालयातून गायब आहे. रजिस्टरचा ताळेबंद कुठेच जुळत नाही. अनेक ठिकाणी अंदाजित रकमेच्या नोंदी, समरी रजिस्टरच्या नोंदीच गायब, थकबाकीची नोटीस कोणालाच न देणे, या सर्व गैरव्यवहारांवर मनपा प्रशासन मौन बाळगून गप्प का, असा प्रश्न मालमत्ताधारकांना पडला आहे.