शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
3
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
4
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
5
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
6
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
7
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
8
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
9
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
10
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
11
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
12
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
13
Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
15
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
16
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
17
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
18
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
19
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
20
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

हतबल शिवसेनेने ‘समांतर’चे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:01 IST

शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले.

ठळक मुद्देयोजना अधांतरी : १० वर्षांत एक लिटर पाणी आणले नाही

औरंगाबाद : शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे गोंडस नाव देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. योजनाच पूर्ण झालेली नसताना नाव कशासाठी बदलण्यात आले, असा आक्षेप एमआयएमने नोंदविला.देशभरात मोठ्या शहरांची नावे बदलण्याचा ट्रेंड सुरू आहे. या राजकारणात भाजपने बरीच आघाडी घेतली आहे. महापालिकेतील शिवसेनेनेही यात उडी घेतली. शहराचे नाव बदलण्यात सेनेला यापूर्वीच अपयश आलेले आहे. आता सेनेने शहराची तहान भागविण्यासाठी उभारण्यात येणाºया जलवाहिनी प्रकल्पाचे नाव बदलले आहे. महापालिका वर्धापन दिनानिमत्त आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी नमूद केले की, समांतर म्हटले तर नागरिकांच्या डोळ्यासमोर एक कंपनी येते. म्हणून आम्ही ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नवीन नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. समांतर म्हणजे पर्यायी असा अर्थ होतो. या प्रकल्पाला समांतर असे नाव कधीच दिलेले नव्हते. ते आपोआप पडले होते. आता आपण त्यास नाव दिले आहे.दहा वर्षांपासून निधी पडूनजायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत २००० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणण्यास केंद्र आणि राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला १६१ कोटी २० लाख रुपये दिले. या निधीवर मनपाने आजपर्यंत १२७ कोटी ९ लाख रुपये व्याज जमा केले आहे. मागील दहा वर्षांपासून शिवसेना-भाजप युती महापालिका निवडणुकांमध्ये समांतरच्या मुद्यावर निव्वळ आश्वासने देत आली आहे. भोळी जनताही युतीच्या शब्दावर विश्वास ठेवत आली आहे. मागील दहा वर्षांमध्ये युतीने एक थेंबही शहरात पाणी आणले नाही.पाणीपुरवठ्याचे खाजगीकरणसमांतर जलवाहिनी नावावर युतीने शहराच्या पाणीपुरवठ्याचे चक्क खाजगीकरण करून टाकले होते. खाजगी कंपनी नागरिकांच्या खिशावर अक्षरश: दरोडे टाकत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी २०१६ मध्ये कंपनीची हकालपट्टी केली. आता परत याच कंपनीला काम देण्यासाठी युतीचे नेते रेड कार्पेट अंथरूण बसले आहेत. कंपनीने मनपावर एवढ्या अटी-शर्ती टाकल्या आहेत की, मनपा त्या अटी कधीच मान्य करू शकत नाही.पाणी कधी येणार?समांतर जलवाहिनीच्या माध्यमाने शहरात पाणी कधी येईल, हे युतीचे नेते ठामपणे सांगू शकत नाहीत. योजनाच सध्या अधांतरी असताना योजनेचे नाव बदलण्याचे धाडस मंगळवारी करण्यात आले. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने याला कडाडून विरोध दर्शविला. योजना तर पूर्ण होऊ द्या, असा सल्लाही विरोधी पक्षाने दिला. बाळ जन्माला येण्यापूर्वीच घाई कशासाठी, असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक