शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हतबल शिवसेनेने ‘समांतर’चे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:01 IST

शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले.

ठळक मुद्देयोजना अधांतरी : १० वर्षांत एक लिटर पाणी आणले नाही

औरंगाबाद : शहराच्या पाणी प्रश्नावर दर पाच वर्षांनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी आणखी एक चमत्कार केला. समांतर जलवाहिनी योजनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी चक्क नाव बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे गोंडस नाव देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. योजनाच पूर्ण झालेली नसताना नाव कशासाठी बदलण्यात आले, असा आक्षेप एमआयएमने नोंदविला.देशभरात मोठ्या शहरांची नावे बदलण्याचा ट्रेंड सुरू आहे. या राजकारणात भाजपने बरीच आघाडी घेतली आहे. महापालिकेतील शिवसेनेनेही यात उडी घेतली. शहराचे नाव बदलण्यात सेनेला यापूर्वीच अपयश आलेले आहे. आता सेनेने शहराची तहान भागविण्यासाठी उभारण्यात येणाºया जलवाहिनी प्रकल्पाचे नाव बदलले आहे. महापालिका वर्धापन दिनानिमत्त आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी नमूद केले की, समांतर म्हटले तर नागरिकांच्या डोळ्यासमोर एक कंपनी येते. म्हणून आम्ही ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नवीन नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. समांतर म्हणजे पर्यायी असा अर्थ होतो. या प्रकल्पाला समांतर असे नाव कधीच दिलेले नव्हते. ते आपोआप पडले होते. आता आपण त्यास नाव दिले आहे.दहा वर्षांपासून निधी पडूनजायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत २००० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणण्यास केंद्र आणि राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला १६१ कोटी २० लाख रुपये दिले. या निधीवर मनपाने आजपर्यंत १२७ कोटी ९ लाख रुपये व्याज जमा केले आहे. मागील दहा वर्षांपासून शिवसेना-भाजप युती महापालिका निवडणुकांमध्ये समांतरच्या मुद्यावर निव्वळ आश्वासने देत आली आहे. भोळी जनताही युतीच्या शब्दावर विश्वास ठेवत आली आहे. मागील दहा वर्षांमध्ये युतीने एक थेंबही शहरात पाणी आणले नाही.पाणीपुरवठ्याचे खाजगीकरणसमांतर जलवाहिनी नावावर युतीने शहराच्या पाणीपुरवठ्याचे चक्क खाजगीकरण करून टाकले होते. खाजगी कंपनी नागरिकांच्या खिशावर अक्षरश: दरोडे टाकत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी २०१६ मध्ये कंपनीची हकालपट्टी केली. आता परत याच कंपनीला काम देण्यासाठी युतीचे नेते रेड कार्पेट अंथरूण बसले आहेत. कंपनीने मनपावर एवढ्या अटी-शर्ती टाकल्या आहेत की, मनपा त्या अटी कधीच मान्य करू शकत नाही.पाणी कधी येणार?समांतर जलवाहिनीच्या माध्यमाने शहरात पाणी कधी येईल, हे युतीचे नेते ठामपणे सांगू शकत नाहीत. योजनाच सध्या अधांतरी असताना योजनेचे नाव बदलण्याचे धाडस मंगळवारी करण्यात आले. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने याला कडाडून विरोध दर्शविला. योजना तर पूर्ण होऊ द्या, असा सल्लाही विरोधी पक्षाने दिला. बाळ जन्माला येण्यापूर्वीच घाई कशासाठी, असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक