शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

पाकिस्तान कारागृहातून आलेल्या हसीना बेगम यांंनी १४ दिवसात घेतला अखेरचा श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:03 IST

औरंगाबाद : नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम यांना पासपोर्ट हरवल्याने तब्बल १८ वर्षे कारागृहात डांबून ठेवण्यात आले ...

औरंगाबाद : नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम यांना पासपोर्ट हरवल्याने तब्बल १८ वर्षे कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते. २६ जानेवारी रोजी पाकिस्तान कारागृहातून सुटून मायभूमीत परतलेल्या हसीना बेगम यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. मायभूमीत उर्वरित आयुष्य जगण्याचे ''हसीन ख्वाब'' त्यांनी बघितले होते. आपले पुरातन घर काही मंडळींनी बळकावल्याचे शल्य त्यांना मागील १४ दिवसांपासून बोचत होते. त्यांनी अचानक घेतलेली एक्झिट अनेकांना धक्का देणारी ठरली.

औरंगाबाद शहरातील रशिदपुरा भागात राहणाऱ्या हसीना बेगम या १८ वर्षांपूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांचा पासपोर्ट गहाळ झाला. त्यामुळे सरकारने त्यांना १८ वर्षे डांबून ठेवले होते. अनेक प्रयत्न केल्यानंतर ६५ वर्षीय हसीना बेगम २६ जानेवारी २०२१ रोजी मायभूमीत सुखरूप परतल्या होत्या. रशिदपुरा भागात त्या आपल्या बहिणीच्या मुलांसोबत आनंदाने राहत होत्या. डॉक्टरांकडून त्यांची सर्व तपासणी करण्यात आली होती. कोणताही आजार त्यांना नव्हता. लवकरच मोतिबिंदूचे ऑपरेशन करण्याचा त्यांचा मानस होता.

पण सोमवारी मध्यरात्री २ वाजता त्यांना अचानक घबराट होऊ लागली. पलंगावर त्या आराम करण्यासाठी पडल्या असता, त्यातच त्यांचे निधन झाले. नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासणी केली असता, त्या मृत झाल्याचे घोषित केले.

मायभूमीत परतल्यानंतर हसीना बेगम अत्यंत आनंदी होत्या. त्यांचे पुरातन घर एका नागरिकाने बळकावले, याचे शल्य त्यांना होते. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांकडेही एक निवेदन सादर केले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. पती दिलशाद अहेमद सहारनपूर येथे राहतात. ते हयात आहेत किंवा नाही याची माहिती नसल्याचे हसीना बेगम यांच्या बहिणीचा मुलगा खाजा जैनोद्दीन चिस्ती यांनी सांगितले.

रशिदपुरा येथील मोहम्मदी मशिदीमध्ये मंगळवारी दुपारी नमाज- ए -जनाजा, तर पिरगैबसाहब दर्गाह परिसरातील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

बाजरीची भाकरी, पुदिन्याची चटणी...

मृत्यूच्या रात्री हसीना बेगम यांनी बाजरीची भाकरी आणि पुदिन्याची चटणी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. बहिणीच्या मुलाने त्यांना, सकाळी आपण चटणी आणि भाकरी तयार करू, असे आश्वासन दिले होते. पण मध्यरात्रीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.