शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हर्सूल कारागृह : पाणावलेल्या डोळ्यांनी बंदिवानांनी घेतली लेकरा-बाळांची ‘गळाभेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:23 IST

‘मत पुछो हाल इस कैद का, आसान नहीं एक भी दिन तुम्हारे बिना इस जेल का’ असे म्हणत बंदिवानांनी अनेक महिन्यांनंतर चिमुकल्यांच्या घेतलेल्या ‘गळाभेटी’ने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे कारागृहाच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. निमित्त होते हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची ‘गळाभेट’ या उपक्रमाचे.

ठळक मुद्देकठोर भिंतींनाही फुटला मायेचा पाझर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मत पुछो हाल इस कैद का, आसान नहीं एक भी दिन तुम्हारे बिना इस जेल का’ असे म्हणत बंदिवानांनी अनेक महिन्यांनंतर चिमुकल्यांच्या घेतलेल्या ‘गळाभेटी’ने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे कारागृहाच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. निमित्त होते हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची ‘गळाभेट’ या उपक्रमाचे.हर्सूल कारागृहात मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १११ कैद्यांनी आपल्या मुलांसोबत दोन तास घालविले. छोट्याशा चुकीपायी, क्षणभराच्या रागामुळे भोगाव्या लागणाºया शिक्षेने बाप-लेकरांमध्ये निर्माण झालेला दुरावा कारागृह प्रशासनाने गळाभेट या उपक्रमातून दूर केला. कार्यक्रमप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक (मध्य विभाग) राजेंद्र धामणे, कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. डी. काळे यांची उपस्थिती होती.शिक्षेमुळे कोणी सहा महिने, कोणी वर्ष, तर कोणी त्यापेक्षा अधिक वर्षांपासून मुलांपासून, कुटुंबापासून दूर झालेले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने चिमुकल्यांना पाहून बंदिवानांतील पिता वेगळ्याच दुनियेत हरवला होता.डोळे भरून वडिलांना पाहण्यात मुलेही हरखून गेली होती. नकळत पाणावलेले, भेटीने भरून आलेले एकमेकांचे डोळे जो-तो पुसत होता. अश्रू भरल्या डोळ्यांनी मुले बºयाच वेळ पित्याच्या गळ्यातच पडून होती. सहा महिन्यांच्या आतील मुलांसोबत कु टुंबातील इतर सदस्यही सोबत आले होते. त्यामुळे मुलांबरोबर पत्नी, आई, बहीण, वडिलांचीही अनेक महिन्यांनंतर भेट झाल्याचे सुख बंदिवानांना मिळाले. एकत्र जेवणाचा आनंदही घेता आला. दोन तासांनंतर कारागृहातून परतानाही अश्रूंचा बांधच फुटला. जड पावलांनी जो-तो कारागृहाबाहेर पडला.यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी ए. एस. गोसावी, आसद मोमीन, तुरुं ग अधिकारी आर. व्ही. उन्हाळे, बी. व्ही. मंचरे, सी. वाय. तायडे, पी. बी. रहेपाडे, विजय सोळंके, विजय मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.महाराष्ट्रातील कैदी पुढे गुन्हेगार बनत नाहीतअन्य राज्यांतील कारागृहात जाणारे कैदी पुढे गुन्हेगार बनतात; परंतु महाराष्ट्रात असे नाही. गळाभेट उपक्रमामुळे कैद्यांमधील तणाव कमी होण्यास मदत होते. विशेषत: रजा न मिळणाºया कैद्यांना कुटुंबाला भेटून समाधान होते, आनंद मिळतो, असे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे म्हणाले.