शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम करण्यावरून शेजाऱ्यांचा त्रास; कंटाळून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:38 IST

एक वर्षापासून गायकवाड हे बांधकाम करीत होते. जवळच राहणारे काही जण बांधकामावरून सतत मानसिक त्रास देत होते.

ठळक मुद्देक्रांतीचौक ठाण्यात १० जणांवर गुन्हा महावीर चौकातील म्हाडा कॉलनीतील घटना

औरंगाबाद : घराचे बांधकाम करण्यावरून शेजाऱ्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी म्हाडा कॉलनीत घडली. घटनास्थळी आढळलेल्या सुसाईड नोटच्या आधारे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

उषा विजय गायकवाड (५४, रा. म्हाडा कॉलनी, महावीर चौक परिसर), असे मृत महिलेचे नाव आहे.  प्रदीप ऊर्फ बालाजी रोंगे, प्रदीप यांची पत्नी, गौरव रोंगे, भुजंग यांची पत्नी, सौरभ भोळे,  लक्ष्मण पगारे, दयानंद आरक, दयानंद यांची पत्नी, मयूर आरक आणि शुभम आरक, अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

एक वर्षापासून गायकवाड हे बांधकाम करीत होते. जवळच राहणारे काही जण बांधकामावरून सतत   मानसिक त्रास देत होते. गायकवाड कुटुंबाने तेथे राहू नये म्हणून सतत  भांडण करीत आणि जिवे मारण्याची धमकी देत. याप्रकरणी  मृत उषा यांच्या पतीने मे २०१९ आणि फेब्रुवारी २०२० मध्ये क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतरही आरोपीकडून त्यांना त्रास देणे सुरूच होते. या त्रासाला  कंटाळून उषा यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर बेशुद्धावस्थेत त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांना त्यांच्या अंगावरील कपड्यात एक चिठ्ठी सापडली. शिवाय घरातील डायरीतही त्यांनी शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. क्रांतीचौक  पोलिसांनी मृताच्या  खोलीतून डायरी आणि चिठ्ठी जप्त केली आहे. तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत.