शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

गुणवंतांना लोकमतचा सलाम

By admin | Updated: June 22, 2014 00:52 IST

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आभाळ ठेंगणे झाले.

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आभाळ ठेंगणे झाले. अव्वल स्थान मिळविण्यासाठी जिद्दीने केलेला अभ्यास व आई-वडिलांच्या अपार कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले, अशी भावना प्रत्येक यशवंतांच्या चेहऱ्यावर झळकत होती. ज्या क्षणासाठी आपण मागील वर्ष अहोरात्र अभ्यास केला तो सुवर्णक्षण आज उजाडला. खुद्द शिक्षणमंत्री आपल्या हातात पुष्पगुच्छ व बक्षीस देत संपूर्ण परिवाराची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत होते... तेव्हा प्रत्येक गुणवंत भारावून गेला होता. लोकमतने आमच्या गुणवत्तेचा सन्मान केला, त्यामुळे मिळालेली ऊर्जा आम्हाला आयुष्यभर उजळवत राहील, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या कौतुक सोहळ्याचे साक्षीदार ठरले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे. उल्लेखनीय म्हणजे बहुतांश गुणवंत विद्यार्थी सहपरिवार सहभागी झाल्याने या गौरव सोहळ्याला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते. आयआयटी प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज लोकमतच्या वतीने करण्यात आला. संपूर्ण लोकमत हॉल, विद्यार्थी व पालकांनी भरून गेला होता. सर्वप्रथम शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सलाम केला. कौतुकात न्हाऊन निघालेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले होते. व्यासपीठावर प्रत्येक गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सन्मानाने बोलावले जात होते. शिक्षणमंत्री व कुलगुरूंसोबत त्यांचा एकत्रित फोटो काढला जात होता. आपल्या मुलाचा सत्कार होताना पाहून बहुतांश पालकही भारावून गेले होते. काही जण आपल्या मुलाच्या सत्काराचे फोटो लगेच व्हॉटस्अपवर शेअर करीत होते. या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे औरंगाबाद शहरातूनच नव्हे तर फुलंब्री, पिशोरसारख्या ग्रामीण भागातूनही गुणवंत विद्यार्थी पालकांसमवेत आले होते. गरीब परिस्थितीवर मात करीत परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी शिक्षणमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. लोकमतचे वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला यांनी प्रास्ताविक करताना आयआयटीत प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले. लोकमतने आमच्या गुणवत्तेचा केलेला सन्मान व मार्गदर्शन आम्हाला आयुष्यात पदोपदी प्रेरणादायी ठरले, अशा उत्स्फूर्त भावना यशवंतांनी व्यक्त केल्या.संपादक सुधीर महाजन, कार्यकारी संपादक चक्रधर दळवी, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, गुरुकुल क्लासेसचे संचालक निर्मल बिस्वाल आदींची उपस्थिती होती.उद्योजक बनून विकासाला हातभार लावाराजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, पूर्वी आयआयटी झाल्यानंतर देशात किंवा विदेशात नामांकित कंपनीत नोकरी करण्याकडे अभियंत्यांचा कल असे. मात्र, आता हे चित्रही बदलत आहे. आयआयटी झालेले अभियंते उद्योजक बनत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी)मध्ये औरंगाबादचा समावेश झाला आहे. यामुळे येत्या काळात औरंगाबाद, जालन्याचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. येथे औद्योगिक भरभराट होणार आहे. यामुळे येथे उद्योजकांना मोठी संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आयआयटी झाल्यानंतर औरंगाबादेत येऊन डीएमआयसीच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्र्यांनी केले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक बना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी आवाहन केले की, आयआयटी झाल्यानंतर नोकरी न करता संशोधक बना. कारण, आज देशाला संशोधक, वैज्ञानिकांची गरज आहे. आयआयटीमधून नोकरी करणारे अभियंते घडू नयेत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक निर्माण व्हावेत. कारण, आपल्या अभ्यासाचा देशालाही फायदा व्हायला पाहिजे. विद्यापीठातील प्राध्यापक हे संशोधक असतात. यामुळे त्यांची शिकविण्याची पद्धतही वेगळी असते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील शिक्षणाची पद्धत शिकून घ्यावी. स्वयंप्रेरणेने अभ्यास करावा. कपिल वैद्यचे शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन आयआयटीच्या जेईई (अ‍ॅडव्हान्स) परीक्षेत राज्यातून प्रथम आणि देशातून तेरावा आलेल्या अकोल्याच्या कपिल वैद्य याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले. त्यांनी कपिलला भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.