शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

फसवणूक प्रकरणी व्यवस्थापकांचे कानावर हात !

By admin | Updated: December 27, 2016 23:58 IST

लातूर : वसंतराव नाईक महामंडळाच्या ११ लाभार्थ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा व्यवस्थापकांकडे करून तीन महिने लोटले आहेत़

लातूर : वसंतराव नाईक महामंडळाच्या ११ लाभार्थ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा व्यवस्थापकांकडे करून तीन महिने लोटले आहेत़ मात्र यावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी जिल्हा व्यवस्थापकांनी कानावर हात ठेवल्याने कारवाई रखडली आहे. लातूर जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. मात्र याचा लाभ या गरिबांना न होता, अन्य दुसऱ्यांनाच मिळत असल्याचे उघड होत आहे़ भटक्या विमुक्तांच्या नावे व दस्तावेजांचा दलाल आणि अधिकाऱ्याकडून गैरवापर करून कर्ज उचलण्यात आले आहेत़ याबाबत वसुली पथकाकडून कर्जवसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़ त्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी कर्ज मिळाले नसल्याच्या तक्रारी जिल्हा व्यवस्थापकांकडे दिल्या आहेत़ त्याला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ मात्र अद्याप कसलीच कार्यवाही करण्यात आली नाही़ दरम्यान, अहमदपूर येथील सहा जणांनी कर्ज प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे़ महामंडळाअंतर्गत अजून किती लोकांची फसवणूक झाली आहे, हे चौकशीअंतीच बाहेर येणार आहे़ मात्र यापूर्वी दिलेल्या तक्रारी संदर्भात जिल्हा व्यवस्थापकांनी साधी चौकशीही केली नाही़ कार्यवाही तर दूरच आहे़ त्यांनी चक्क कानावर हात ठेवल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत आहे़ (प्रतिनिधी)