शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

नवीन पीक कर्जासाठी बँकांकडून हात आखडता

By admin | Updated: August 7, 2014 01:54 IST

बालाजी आडसूळ , कळंब जिल्हा बँकेच्या शाखा वगळता तालुक्यातील १३ बँक शाखांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी ४०६४ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयाच्या पीककर्जाचे वाटप केले आहे.

बालाजी आडसूळ , कळंबजिल्हा बँकेच्या शाखा वगळता तालुक्यातील १३ बँक शाखांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी ४०६४ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयाच्या पीककर्जाचे वाटप केले आहे. परंतु, जुलै अखेर केलेल्या कर्ज वाटपामध्ये ३ हजार ३३६ शेतकरी जुनेच असून, केवळ ७२८ नवीन शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. यातही काही शाखा नवीन कर्जवाटपासाठी वेळकाढूपणा करीत आहेत.दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज घेण्यासाठी धावपळ दिसून येते. कळंब तालुक्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ शाखा आहेत. याशिवाय तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ शाखा असून, यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाची कळंब, येरमाळा, मंगरुळ येथे स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या कळंब व आंदोरा येथे तर बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडियाची कळंब येथे शाखा आहे. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब, खामसवाडी, मोहा, शिराढोण, मस्सा (खं) येथे पाच शाखा तर खाजगी व्यावसायिक बँक आयसीआयसीआयची कळंब येथे एक शाखा आहे. उपरोक्त सर्व शाखांना ठराविक प्रमाणात रिझर्व्ह बँक व शासनाच्या धोरणानुसार पीककर्ज देणे बंधनकारक आहे.जिल्हा बँक अडचणीत असल्याने गत चार वर्षापासून या बँकेत नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात येत नाही. यामुळे जुन्या कर्जदार सभासदाचे कर्र्ज भरणा करुन घेवून त्यांनाच नवीन वाटप करण्यावर या बँक शाखेचा भर दिसून येत आहे. तर राष्ट्रीयकृत बँकामध्ये कळंबच्या बँक आॅफ इंडियाने नवीन शाखा असतानाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देत तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोहा, खामसवाडी येथील शाखेत नवीन कर्ज वाटपाच्या बाबतीत हात आखडला असून, शेतकरी, कर्मचाऱ्यांकडे मनधरणी करुन बेजार झाले आहेत.