शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

औरंगाबादेत ३५० वर्ष जुन्या ऐतिहासिक वारशावर हातोडा; इतिहासप्रेमी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 19:11 IST

लेबर कॉलनीसह किले अर्कची ऐतिहासिक तटबंदीही पाडली

औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनी भुईसपाट केली. मात्र, या दरम्यान किले अर्कची ऐतिहासिक तटबंदीही पाडण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. इतिहासतज्ज्ञ दुलारी आणि रफत कुरेशी दाम्पत्याने तटबंदी नष्ट होत असल्याचे पाहून विरोध सुरू केला. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनाने ३५० वर्षं जुनी तटबंदी पाडायचे काम सुरूच ठेवल्याने इतिहास अभ्यासकांनी संताप व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी एकत्रित मोहीम राबवत बुधवारी सकाळी ६.३० वाजता ७० वर्ष जुन्या लेबर कॉलनीवर बुलडोझर फिरवला. या ठिकाणी आता मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय इमारत उभा राहणार आहे. मात्र. लेबर कॉलनीच्या जवळ असलेली किले अर्कची ऐतिहासिक तटबंदी देखील यावेळी पाडण्यात आली. हे लक्षात येताच इतिहासतज्ज्ञ कुरेशी दाम्पत्याने याला विरोध केला. मात्र तरीही पाडापाडीची कारवाई सुरूच होती. शहराची ऐतिहासिक ओळख आता बोटांवर मोजता येईल अशा थोड्या वास्तूंवर टिकून आहे. यातच ३५० वर्ष जुनी तटबंदी पाडल्याने शहराचे मोठे नुकसान झाले झाल्याच्या भावना व्यक्त करत प्रशासनाला शहराच्या ऐतिहासिक ओळखीशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही का ? असा सवाल इतिहास अभ्यासक तथा गडकिल्ले संवर्धन समितीचे माजी सदस्य संकेत कुलकर्णी यांनी केला आहे.  

शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होतोय खासगेट पाडले, खूनी दरवाजा गेला, रणछोडदास हवेली आणि दमडी महाल जमीनदोस्त झाले. फाजलपुऱ्याचा पूल गेला, थत्ते नहराचा बळी घेतला, मेहमूद दरवाजा होत्याचा नव्हता झाला, किले अर्क संपवला. आता उरलीसुरली तटबंदी पाडण्यात आल्याने पर्यटनाच्या राजधानीत ऐतिहासिक काय उरणारम असा संताप इतिहास अभ्यासकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारावर प्रशासन, हेरिटेज कमिटी काहीच बोलत नाहीत असा आक्षेप अभ्यासकांनी घेतला आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संवर्धनाचे आदेश दरम्यान, तटबंदी पडल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परिसराची पाहणी केली. तसेच तटबंदीच्या संवर्धनाचे आदेश दिले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादhistoryइतिहासAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका