शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

औरंगाबादेत ३५० वर्ष जुन्या ऐतिहासिक वारशावर हातोडा; इतिहासप्रेमी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 19:11 IST

लेबर कॉलनीसह किले अर्कची ऐतिहासिक तटबंदीही पाडली

औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनी भुईसपाट केली. मात्र, या दरम्यान किले अर्कची ऐतिहासिक तटबंदीही पाडण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. इतिहासतज्ज्ञ दुलारी आणि रफत कुरेशी दाम्पत्याने तटबंदी नष्ट होत असल्याचे पाहून विरोध सुरू केला. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनाने ३५० वर्षं जुनी तटबंदी पाडायचे काम सुरूच ठेवल्याने इतिहास अभ्यासकांनी संताप व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी एकत्रित मोहीम राबवत बुधवारी सकाळी ६.३० वाजता ७० वर्ष जुन्या लेबर कॉलनीवर बुलडोझर फिरवला. या ठिकाणी आता मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय इमारत उभा राहणार आहे. मात्र. लेबर कॉलनीच्या जवळ असलेली किले अर्कची ऐतिहासिक तटबंदी देखील यावेळी पाडण्यात आली. हे लक्षात येताच इतिहासतज्ज्ञ कुरेशी दाम्पत्याने याला विरोध केला. मात्र तरीही पाडापाडीची कारवाई सुरूच होती. शहराची ऐतिहासिक ओळख आता बोटांवर मोजता येईल अशा थोड्या वास्तूंवर टिकून आहे. यातच ३५० वर्ष जुनी तटबंदी पाडल्याने शहराचे मोठे नुकसान झाले झाल्याच्या भावना व्यक्त करत प्रशासनाला शहराच्या ऐतिहासिक ओळखीशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही का ? असा सवाल इतिहास अभ्यासक तथा गडकिल्ले संवर्धन समितीचे माजी सदस्य संकेत कुलकर्णी यांनी केला आहे.  

शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होतोय खासगेट पाडले, खूनी दरवाजा गेला, रणछोडदास हवेली आणि दमडी महाल जमीनदोस्त झाले. फाजलपुऱ्याचा पूल गेला, थत्ते नहराचा बळी घेतला, मेहमूद दरवाजा होत्याचा नव्हता झाला, किले अर्क संपवला. आता उरलीसुरली तटबंदी पाडण्यात आल्याने पर्यटनाच्या राजधानीत ऐतिहासिक काय उरणारम असा संताप इतिहास अभ्यासकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारावर प्रशासन, हेरिटेज कमिटी काहीच बोलत नाहीत असा आक्षेप अभ्यासकांनी घेतला आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संवर्धनाचे आदेश दरम्यान, तटबंदी पडल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परिसराची पाहणी केली. तसेच तटबंदीच्या संवर्धनाचे आदेश दिले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादhistoryइतिहासAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका