शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

रांजणगावातील अतिक्रमणांवर पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:39 IST

रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे जवळपास ४ हजार मालमत्ताधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, यासाठी शेख सिंकदर बुढण यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीला गावातील गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश न्यायमूर्ती आर.बी.अवचट व न्या. एस.एस. शिंदे यांनी दिले आहेत. सदरील अतिक्रमणांवर कारवाई करताना स्थानिक ग्रामपंचायतीचा आवश्यक पोलीस संरक्षण पुरविण्याचे सांगण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश बजावले होते. अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती मिळावी, यासाठी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अतिक्रमणधारकांनी कागदपत्रे महसुली अधिकाऱ्यांकडे सादर करावीत व अधिकाऱ्यांनी शहानिशा करुन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे पंढरपुरातील अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे. आता रांजणगावातील अतिक्रमणांवर कारवाईच्या आदेशामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.

४ हजार मालमत्ता धोक्यातउच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रांजणगावातील जवळपास ४ हजार मालमत्ता धोक्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गावातील गट क्रमांक-२ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक स्मशानभुमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ग्रामपंचायतीला जलकुंभ, जि.प.ची प्राथमिक शाळा, अंगणावाडी तसेच शेकडो घरे आहेत. या शिवाय महार हाडोळा असलेल्या विविध गट क्रमांकामध्ये हजारो घरे, दुकाने, हॉस्पीटल, धार्मिक स्थळे आदींचा समावेश आहे. गावातील जवळपास ५० ते ६० एकरमधील मालमत्ता अतिक्रमणात असल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.

टॅग्स :WalujवाळूजCourtन्यायालय