शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: June 24, 2014 00:21 IST

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले.

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले. एकाच दिवसात सुमारे दीडशे दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले असून मंगळवारी गांधीचमनपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी सुरू केली.पहिल्याच दिवशी वीर सावरकर चौक पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी नूतन वसाहत भागातील अतिक्रमणे हटविली.रविवारी सुटीमुळे ही मोहीम राबविण्यात आली नाही. मात्र आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता जुना जालन्यातील सर्वात जुना बाजार ओळखल्या जाणाऱ्या बाजार चौकी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास पालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रारंभ केला. दोन्ही बाजूंची सुमारे दीडशे अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. या भागात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सुरूवातीला नागरिकांना काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात आले नाही. विक्रेत्यांनाही कळले नाही. मात्र अतिक्रमणे हटविण्यास पालिका कर्मचारी व पोलिसांचे पथक असल्याचे कळताच अतिक्रमणे केलेल्या काही विक्रेत्यांनीही आपली अतिक्रमणे स्वत:हून काढण्यास सुरूवात केली. हा रस्ता अत्यंत अरूंद आहे. विक्रेत्यांच्या दुकानासमोर किरकोळ भाजीपाला विक्रेते खाली रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसतात. त्यामुळे या भागातून दुचाकीधारकांनाही ये-जा करण्यास अडचण होते. शिवाय मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांची या भागातून ये-जा सुरू असते. अशावेळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना विशेषत: महिलांना त्रास होतो. त्यामुळे या बाजारातील अतिक्रमण हटविणे महत्वाचे होते. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अनेक दिवसांपासून थाटलेली होती अतिक्रमणेबाजार चौकी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणे आहेत. मात्र त्याकडे प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आलेले आहे. एक-दोन वेळा ही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र तेथे पुन्हा अतिक्रमणे थाटण्यात आली. नगरपालिकेने यापूर्वी सदर भागातील अतिक्रमणे हटविण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्ष कारवाई केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचारी व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. महिला वर्गातून कारवाईबद्दल समाधानजुना जालन्यातील सर्वात जुनी भाजीमंडई म्हणून बाजारचौकी परिसराची ओळख आहे. मात्र अनेक दिवसांपासून या भागात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे येथे सतत रहदारी ठप्प होते. या अतिक्रमणांचा त्रास रहदारीला तर होतोच, परंतु बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही होतो. त्यामुळे या मोहिमेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे.