शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

अर्धे वर्षे सरले तरी निधी वाटप होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:41 IST

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी दिला जाणारा निधी अर्धे वर्षे सरले तरी बहुतांश यंत्रणांना वितरित झालेला नाही़ त्यामुळे उरलेल्या अर्ध्या वर्षात निधी मिळवून विकास कामे करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे़जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, कृषी, रोजगार आदी घटकांच्या विकास कामांसाठी निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या निधीला मंजुरी देवून तो संबंधित यंत्रणेद्वारे खर्च केला जातो़ यासाठी जिल्हा नियोजन समितीची कार्यकारिणी मंजुरीचे काम करीत असते़ परभणी जिल्ह्यात एप्रिल २०१७ पासून नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला़ यावर्षासाठी १४१ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ त्यामुळे हा निधी विविध यंत्रणांना वितरित करून कामांना प्रारंभ होणे अपेक्षित होते़ मात्र आॅक्टोबर महिना उजाडला तरीही अनेक यंत्रणांना निधीचे वितरण झालेले नाही़ जिल्ह्यातील यंत्रणांनी निधीसाठी प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असते़ अशा यंत्रणांकडून प्रस्तावच आले नसल्याने निधीचे वितरण रखडले आहे़ सहा महिन्यांमध्ये काही बोटावर मोजण्या इतक्याच यंत्रणांना निधी वितरित झाला आहे़ त्यात रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, लघु पाटबंधारे विभाग या विभागांना काही प्रमाणात निधी वितरित झाला असून, उर्वरित सर्व यंत्रणांच्या निधी वितरणाचे काम प्रक्रियेत आहे़ मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील यंत्रणांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्याविषयी उदासिन भूमिका राहिली आहे़ एप्रिल, मे महिन्यात निधीदेवूनही संपूर्ण वर्षभरात निधी खर्च होत नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत़ यावर्षी तर आॅक्टोबर महिना उजाडला तरी यंत्रणांना निधीच वितरित झालेला नाही़ त्यामुळे यापुढे यंत्रणांचे प्रस्ताव कधी दाखल होतील आणि केव्हा या यंत्रणा विकास कामे करतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यामुळे विकास कामांसाठी निधीची तरतूद असतानाही कामे मात्र ठप्प आहेत.