शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

सहा लाख लोकांचे रेशन बंद !

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड आस्मानी संकटांचे आघात सहन करणाऱ्या बीडकरांवर आता सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडआस्मानी संकटांचे आघात सहन करणाऱ्या बीडकरांवर आता सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून १ लाख ९१ हजार ५६९ एपीएल (केशरी) कार्डधारकांना स्वस्त धान्य मिळालेले नाही. त्यामुळे तब्बल ६ लाख ३२ हजार २९० इतक्या लोकांच्या ‘पोटा’पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेशनच्या पुरवठ्यालाच विलंब होत असल्याने हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आता रेशनचे धान्य मिळणेही दुरापास्त बनले आहे. जिल्ह्यात एकून २ हजार १०० इतकी स्वस्त धान्य दुकाने आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरी भागात ५ लाख १४ हजार ६८५ तर ग्रामीण भागातून २० लाख ७१ हजार २७७ च्या जवळपास स्वस्त धान्य दुकानाचे लाभार्थी आहेत. यामध्ये बीपीएल, अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, अन्नपुर्णा योजना तसेच एपीएल चे लाभार्थी आहेत. केंद्र सरकारकडूनच एपीएलचे धान्य येत नसल्याचे पुरवठा विभागातील अधिकारी लाभार्थ्यांना सांगत आहेत. यामुळे धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी आलेल्या गोरगरीबांना अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून आल्या पावलांने परतावे लागत आहे.बीपीएल कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र एपीएल धारकांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. बीड तालुक्यातील भगवानवाडी येथील ग्रामस्थांना मागील अनेक महिन्यापासून स्वस्त धान्य मिळालेले नसल्यामुळे ग्रामस्थांनी गुरूवारी तहसील कार्यालयाकडे धाव घेवून तहसीलदारांकडे स्वस्त धान्याची मागणी केली आहे.पुरवठा अधिकारी सुर्यकांत सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एपीएल धारकांचे धान्य शासनाकडूनच मागील चार महिन्यापासून आलेले नाही. धान्य येताच वाटप करण्यात येईल असे ते म्हणाले.एपीएल अंतर्गत असलेल्या पावणेदोन लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांमधील केवळ ९ हजार ५०७ लाभार्थ्यांनाच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होत असल्याचे पुरवठा विभागातील माहितीपत्रकावरून स्पष्ट होते.शासनाकडून स्वस्त धान्य दुकानावरून देण्यात येणाऱ्या धान्याचा कोटा देखील तीस टक्याने घटविण्याचा निर्णय केंद्र शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे.४बीड जिल्ह्यात मागील चार वर्षापासून अत्यल्प पाऊस पडत आहे. ४यातच शासन स्वस्त धान्यही वेळेवर देत नसल्याने गोरगरीब नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना उपाययोजना करण्याची मागणी हेली.