शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख लोकांचे रेशन बंद !

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड आस्मानी संकटांचे आघात सहन करणाऱ्या बीडकरांवर आता सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडआस्मानी संकटांचे आघात सहन करणाऱ्या बीडकरांवर आता सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून १ लाख ९१ हजार ५६९ एपीएल (केशरी) कार्डधारकांना स्वस्त धान्य मिळालेले नाही. त्यामुळे तब्बल ६ लाख ३२ हजार २९० इतक्या लोकांच्या ‘पोटा’पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेशनच्या पुरवठ्यालाच विलंब होत असल्याने हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आता रेशनचे धान्य मिळणेही दुरापास्त बनले आहे. जिल्ह्यात एकून २ हजार १०० इतकी स्वस्त धान्य दुकाने आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरी भागात ५ लाख १४ हजार ६८५ तर ग्रामीण भागातून २० लाख ७१ हजार २७७ च्या जवळपास स्वस्त धान्य दुकानाचे लाभार्थी आहेत. यामध्ये बीपीएल, अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, अन्नपुर्णा योजना तसेच एपीएल चे लाभार्थी आहेत. केंद्र सरकारकडूनच एपीएलचे धान्य येत नसल्याचे पुरवठा विभागातील अधिकारी लाभार्थ्यांना सांगत आहेत. यामुळे धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी आलेल्या गोरगरीबांना अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून आल्या पावलांने परतावे लागत आहे.बीपीएल कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र एपीएल धारकांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. बीड तालुक्यातील भगवानवाडी येथील ग्रामस्थांना मागील अनेक महिन्यापासून स्वस्त धान्य मिळालेले नसल्यामुळे ग्रामस्थांनी गुरूवारी तहसील कार्यालयाकडे धाव घेवून तहसीलदारांकडे स्वस्त धान्याची मागणी केली आहे.पुरवठा अधिकारी सुर्यकांत सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एपीएल धारकांचे धान्य शासनाकडूनच मागील चार महिन्यापासून आलेले नाही. धान्य येताच वाटप करण्यात येईल असे ते म्हणाले.एपीएल अंतर्गत असलेल्या पावणेदोन लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांमधील केवळ ९ हजार ५०७ लाभार्थ्यांनाच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होत असल्याचे पुरवठा विभागातील माहितीपत्रकावरून स्पष्ट होते.शासनाकडून स्वस्त धान्य दुकानावरून देण्यात येणाऱ्या धान्याचा कोटा देखील तीस टक्याने घटविण्याचा निर्णय केंद्र शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे.४बीड जिल्ह्यात मागील चार वर्षापासून अत्यल्प पाऊस पडत आहे. ४यातच शासन स्वस्त धान्यही वेळेवर देत नसल्याने गोरगरीब नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना उपाययोजना करण्याची मागणी हेली.