शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अर्धा टक्काच पाणीसाठा !

By admin | Updated: June 18, 2016 01:00 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील प्रकल्पात शिल्लक नाही. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार केवळ ०.५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात २ मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये माजलगाव बॅक वॉटर व मांजरा प्रकल्पाचा समावेश आहे. यातील माजलगाव प्रकल्पात ४० द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. याच पाण्यावर बीड शहरातील पाणीपुरवठ्याची मदार असून, हे पाणी जूनअखेरपर्यंतच पुरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मांजरा प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक नाही. या ठिकाणी काही सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात १० मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये ६.३७ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे, तर लघु प्रकल्प १११ आहेत. यामध्ये परळी विभागात असलेल्या एकूण प्रकल्पात १.६ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणीही उपयुक्त साठ्यापेक्षा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ७ जूननंतर पाऊस पडेल व सिंचन प्रकल्पांत थोडेफार पाणी येईल अशी अपेक्षा होती; मात्र पाऊस लांबणीवर पडत असल्याने पिण्याच्या पाण्याचे वांधे झाले आहेत.प्रशासनाकडे टंचाई काळातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या तरी उपाययोजना असल्याचे पाहावयास मिळत नाही. यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचे अधिकच दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे.धारूर व केज शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार असलेल्या कुंडलिका धरणात केवळ १७ दलघमी पाणी शिल्लक असून यापैकी ८ दलघमी पाणीच पिण्यासाठी उचलता येऊ शकते. केज व धारूर शहराला सध्या कुंडलिका धरणावरून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.अंबाजोगाई शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे काळवटी धरण कोरडेठाक पडले आहे. अधिग्रहीत केलेल्या काही उदभवावरच अंबाजोगाईची पिण्याच्या पाण्याची मदार आहे.