शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

अर्धा टक्काच पाणीसाठा !

By admin | Updated: June 18, 2016 01:00 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील प्रकल्पात शिल्लक नाही. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार केवळ ०.५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात २ मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये माजलगाव बॅक वॉटर व मांजरा प्रकल्पाचा समावेश आहे. यातील माजलगाव प्रकल्पात ४० द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. याच पाण्यावर बीड शहरातील पाणीपुरवठ्याची मदार असून, हे पाणी जूनअखेरपर्यंतच पुरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मांजरा प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक नाही. या ठिकाणी काही सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात १० मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये ६.३७ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे, तर लघु प्रकल्प १११ आहेत. यामध्ये परळी विभागात असलेल्या एकूण प्रकल्पात १.६ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणीही उपयुक्त साठ्यापेक्षा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ७ जूननंतर पाऊस पडेल व सिंचन प्रकल्पांत थोडेफार पाणी येईल अशी अपेक्षा होती; मात्र पाऊस लांबणीवर पडत असल्याने पिण्याच्या पाण्याचे वांधे झाले आहेत.प्रशासनाकडे टंचाई काळातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या तरी उपाययोजना असल्याचे पाहावयास मिळत नाही. यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचे अधिकच दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे.धारूर व केज शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार असलेल्या कुंडलिका धरणात केवळ १७ दलघमी पाणी शिल्लक असून यापैकी ८ दलघमी पाणीच पिण्यासाठी उचलता येऊ शकते. केज व धारूर शहराला सध्या कुंडलिका धरणावरून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.अंबाजोगाई शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे काळवटी धरण कोरडेठाक पडले आहे. अधिग्रहीत केलेल्या काही उदभवावरच अंबाजोगाईची पिण्याच्या पाण्याची मदार आहे.