शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निम्मे नेपानगर फसले

By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या गावांतही आपले जाळे पसरविले होते.

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीने केवळ राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या गावांतही आपले जाळे पसरविले होते. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्यातील शेकडो कुटुंबांनी आपली शेती, घर, दागदागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. आता या कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे नेपानगरातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. औरंगाबादेत गुन्हा नोंदविण्यास नकारऔरंगाबाद पोलिसांनी सुपर पॉवरच्या संचालकांना अटक केल्याचे समजताच फसल्या गेलेले नेपानगरातील आठ ते दहा गुंतवणूकदार रविवारीच औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी त्यांना कुणी भेटलेच नाही. सोमवारी सकाळी या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांची तक्रार पोलिसांनी स्वीकारली नाही. ‘तुम्ही नेपानगरात पैसे भरलेले आहेत. तिकडेच तुम्हाला तक्रार द्यावी लागेल’ असे सांगून या गुंतवणूकदारांना परत पाठविण्यात आले. तक्रार देण्यासाठी आलेल्या नेपानगरातील गुंतवणूकदारांमध्ये प्रल्हाद कासारे, किशोरीलाल कठोतिया, वीरेंद्र पांझरे, मनोज चौरे, शिरीषकुमार रायबागकर, अशोक आर्या, शरदचंद्र मिस्त्रा यांचा समावेश आहे. आठ दिवसांपासून भटकंतीनेपानगरातील हे गुंतवणूकदार गेल्या आठ दिवसांपासून पैशांसाठी भटकंती करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी ते महाराष्ट्रात आले. नाशिकला पारखेच्या घरी गेले. तेथे त्याच्या नातेवाईकांनी धमकावून हुसकावून लावले. मग ते नाशिक आयुक्तालयात गेले. तेथून त्यांना पंचवटी ठाण्यात पाठविण्यात आले. पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार देऊन औरंगाबादला तक्रार द्या, असे सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर येथेही त्यांची सोमवारी तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. शेवटी हताश होऊन ते गावाकडे परतले आहेत. विशेष म्हणजे या गुंतवणूकदारांकडे आज राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि गावी जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. नेपानगराला साडेतीन कोटींचा चुनानेपानगरातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांनी सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणुकीची एकूण रक्कम सुमारे साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादेतील रहिवासी असलेल्या कैलास महाजन या व्यक्तीने नेपानगरात जाऊन तेथील नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले होते, असे येथील नेपानगरातून आलेले किशोरीलाल कठोतिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. फसल्या गेलेले जवळपास सर्वच जण गरीब आहेत. कुणी शेती विकली, कुणी दागदागिने गहाण ठेवले, तर कुणी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम या कंपनीत गुंतविली होती, असेही कठोतिया म्हणाले. गुंतवणूकदार म्हणतात...गावी गेलो तर लोक ठार मारतील!औरंगाबादेत तक्रार देण्यासाठी आलेले हे गुंतवणूकदार प्रचंड दहशतीत होते. कारण या गुंतवणूकदारांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेकडो नातेवाईकांनीही गुंतवणूक केलेली आहे. आमचे पैसे घेऊन परत या, नाही तर ठार मारू, असे इतर गुंतवणूकदारांनी आम्हाला धमकावले आहे. आता गावात जावे तरी कसे? असा सवाल नेपानगरहून आलेल्या शिरीषकुमार रायबागकर यांनी उपस्थित केला. पोलिसांकडूनकार्यालयाची झाडाझडती सुपर पॉवर या कंपनीचे सिंधी कॉलनीत असलेल्या कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी झडती घेतली. या कार्यालयातून काही धनादेश, महत्त्वाची कागदपत्रे, संगणक जप्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती.