शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

अर्धे शहर अंधारात; ९७ पोलही उखडले

By admin | Updated: April 14, 2015 00:41 IST

लातूर : लातूर शहरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि महावितरणचे ९७ पोल उखडल्याने अर्धे शहर अंधारात राहिले. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज उपलब्ध झाली

लातूर : लातूर शहरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि महावितरणचे ९७ पोल उखडल्याने अर्धे शहर अंधारात राहिले. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांत इंटरनेटअभावी कामकाज ठप्प राहिले.वादळी वारे अन् पावसाने लातूर जिल्ह्यात थैमान घातले आहे़ त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे़ रविवारी रात्री लातूरच्या एमआयडीसीतील ३३ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफार्मर जळाल्याने रात्रभर एमआयडीसीचा बहुतांश भाग अंधारात होता़ याशिवाय तांदुळजा, गादवड, रेणापूर भागातही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़ पहिल्याच वादळात महावितरणचे ९७ विद्युत खांब उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ लातूर विभागात १ ते १२ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उच्चदाब वाहिनीचे १८ तर लघुदाब वाहिनीचे ९७ पोल उखडले आहेत़ तर लातूर शहरातील एमआयडीसीत असलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर रविवारी रात्री नादुरूस्त झाल्याने या भागातील जुनी शासकीय कॉलनी, नवीन शासकीय कॉलनी, शिवाजी चौक या तीन फिडरचा वीजपुरवठा काही वेळ खंडित झाला होता़ मात्र, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी इतर वाहिनीवरून तो सुरू करण्यात आला आहे़ तांदुळजा, गादवड व रेणापूर भागात सर्वाधिक नुकसान झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले़ निलंगा विभागात ९३ पोल व ५ रोहित्र कोसळले आहेत़ उदगीर विभागात वादळी पावसामुळे उच्चदाब वाहिनीचे ४८ तर लघुदाब वाहिनीचे ११३ पोल व ३ रोहित्र कोसळल्याने या भागात वीजपुरवठा खंडित होता़ शनिवारच्या वादळात पडलेले पोल रविवारी उभे करण्यात आले आहेत़ दरम्यान, येरोळ व करडखेल उपकेंद्रातून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)