शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

हज यात्रा : गुलाम नबी आझाद यांनी दाखविला हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:09 IST

मराठवाड्यातील ३०० हज यात्रेकरूंचा पहिला जथा रविवारी सायंकाळी औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून थेट जेद्दाह येथे रवाना झाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील ३०० हज यात्रेकरूंचा पहिला जथा रविवारी सायंकाळी औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून थेट जेद्दाह येथे रवाना झाला. यात्रेकरूंना सोडण्यासाठी ऐतिहासिक जामा मशीद येथे भाविकांच्या नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. चिंब डोळ्यांनी नातेवाईकांनी भाविकांची गळाभेट घेत निरोप दिला. यात्रेकरूंच्या बसला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखविला.मराठवाड्यातील यात्रेकरूंना पूर्वी हजला जाण्यासाठी मुंबई गाठावी लागत होती. एका भाविकासोबत किमान १५ नातेवाईक मुंबईला जात असत. यात्रेकरूंच्या नातेवाईकांना आर्थिक फटका तर बसतच होता, शिवाय ये-जा करण्यास बराच त्रासही सहन करावा लागत होता. मराठवाड्यातील मुस्लिम बांधवांचे दु:ख लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादहून थेट जेद्दाह अशी विमानसेवा २००४ मध्ये सुरू केली.ही सेवा आजही अखंडितपणे सुरू आहे. यंदा मराठवाड्यातील तीन हजारांहून अधिक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जाणार आहेत. १३ आॅगस्टपासून यात्रेकरूंच्या हज यात्रेला जाण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जामा मशीद येथे यात्रेकरूंच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रविवारी दुपारी १ वाजता यात्रेकरूंच्या बसला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्टÑचे प्रभारी मोहन प्रकाश, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, इब्राहीम पठाण, हज कमिटीचे चेअरमन इब्राहीम भाईजान, अ‍ॅड. सय्यद अक्रम, फेरोज खान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. चिंब डोळ्यांनी यात्रेकरूंना निरोप देण्यात आला.जामा मशीद येथून ३०० यात्रेकरूंना चिकलठाणा विमानतळावर आणण्यात आले. सायंकाळी ५.५५ वाजता पहिल्या विमानाने १५० यात्रेकरूंसह झेप घेतली. त्यानंतर रात्री ८ वाजता दुसºया विमानातून १५० यात्रेकरू रवाना झाले. दररोज दोन विमानाद्वारे यात्रेकरू रवाना होणार आहेत.