शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गारपीटग्रस्तांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: July 16, 2014 00:46 IST

सेलू : रबी हंगामाची पिके जोमात असताना अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली़

सेलू : रबी हंगामाची पिके जोमात असताना अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली़ तालुका कृषी अधिकारी कार्यालय व महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे पंचनामे केल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी राम रोडगे व तहसीलदार आसाराम छडीदार यांना घेराव घालून सोमवारी हे आंदोलन केले़ मार्च महिन्यात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती़ त्यामुळे शेतातील रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व भाजीपाला व फ ळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या़ त्यानंतर महसुल विभाग व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले़ परंतु, अनेक शिवारातील पंचनामे चुकीच्या पध्दतीने करण्यात आले़ नुकसान झालेले असतानाही पंचनामे करताना चुका झाल्यामुळे शेकडो शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिले़ तालुक्यातील रायपुर, खैरी, सावंगी, निरवाडी, गिरगाव, चिकलठाणा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करताना दुजाभाव केल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले, काही शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊनही तुटपुंजे अनुदान मिळाले त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांना धारेवर धरत तहसीलदार आसाराम छडीदार यांनाही जाब विचारला़ रायपुर परिसरातील शेकडो शेतकरी सोमवारी तहसील कार्यालयात दाखल झाले़ नुकसान होवूनही पंचनामे करताना दुजाभाव केल्यामुळे आम्हाला अनुदान मिळाले नाही दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आम्ही काय करावे असा संतप्त सवालही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला़ यावेळी रायपुरचे सरपंच सुंदर गाडेकर, चिकलठाण्याच्या सरपंच कमलबाई लोखंडे, रामेश्वर गाडेकर, गुलाब रोडगे, सचिन गाडेकर, राजेंद्र गाडेकर यांच्यासह या परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले़ (प्रतिनिधी)चुकीच्या पंचनाम्यामुळे शेतकरी वंचिततालुक्यात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली परिणामी शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याचे काम सुरू झाले़ परंतु, महसुल व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे पंचनामे करताना गांभीर्याने काम केले नाही़ त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले़ तर काही शेतकऱ्यांना तुटपुंजे अनुदान मिळाले़ याद्या जाहीर झाल्यानंतर ही वंचित शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे खेटे मारले़ परंतु, त्याचा उपयोग झाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़