शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकरी अधिकार्‍यांना भेटले

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

मन्नास पिंपरी: सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीने रबी पिकाचे अतोनात नुकसान झाले;

मन्नास पिंपरी: सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीने रबी पिकाचे अतोनात नुकसान झाले; परंतु तलाठ्याने चुकीच्या पद्धतीने सर्वे केल्यामुळे ८० टक्के शेतकरी गारपिटीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांची नावे यादीत समाविष्ट करून अनुदान त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मन्नास पिंपरी येथील शेतकर्‍यांनी ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून मागणीचे निवेदन दिले. यावेळी दत्तराव पारीसकर, शेख खाजा, संतोष नागुलकर, रामेश्वर हेकड, डॉ. गजानन पारीसकर, ज्ञानबा पारीसकर, जनार्धन पारीसकर, दत्तराव सोनुने, गजानन राऊत, रामेश्वर सोनुने, सागर ढोरे, सुभाष मोरे, मोहन शिंदे, नारायण राऊत, शालीकराव मोरे, सुरेश नेहूल यांच्यासह शंभराहून अधिक शेतकरी उपस्थित होते. वादळी वार्‍यांसह गारपिट झाल्याने पिके उद्ध्वस्त झाली; परंतु तलाठी सूर्यवंशी यांनी स्थळपंचनामा न करताच घरी बसून सर्वे केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ८० शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ करून त्यांना अनुदान द्यावे. तसेच संबंधित तलाठ्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)