शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

हिंगोलीत पाणीपुरवठा योजनांच्या नव्या निकषांबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: August 7, 2014 23:30 IST

हिंगोली : कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.

हिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजनांसाठी बदललेल्या निकषांबाबत मार्गदर्शनासाठी हिंगोलीत घेण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती. नव्याने आलेल्या ४ शासन निर्णयांमुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे यावर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कामे होण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार आदींनी मार्गदर्शन केले. शासनाने आता पाणीपुरवठा योजनेसाठी दहा टक्के लोकवर्गणी माफ केली आहे. तसेच लोकसंख्येनुसार दरडोई वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे. २00२ पासून २0१३ पर्यंतचे दर रद्द करून नवीन दर लागू केले आहेत. त्यामुळे योजनांची किंमत वाढणार आहे. या शिवाय खर्चाच्या अधिकारामध्येही बदल केला आहे. पूर्वी कार्यकारी अभियंत्यांना ५0 लाखांपर्यंतच्याच कामांना तांत्रिक मान्यता देता येत होती. आता २ कोटींपर्यंत देता येईल. तसेच अधीक्षक अभियंत्यांना ५ ते ७.५ कोटींपर्यंतच्या कामास तर त्यापुढील काम शासनाकडे मान्यतेसाठी पाठविल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळणार आहे. कार्यकारी अभियंता एंबडवार यांनी प्रोजेक्टरद्वारे योजनेविषयी माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना पाणी ही प्रत्येकाची मुलभूत गरज असल्याने ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजे, असे आग्रहपूर्वक पाहण्याचे आवाहन केले. यावर्षीच्या आराखड्यात ३९ गावांना पाणीपुरवठा मंजूर आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहनही केले.सूत्रसंचालन संघरत्न नरवाडे यांनी केले. तर राजेंद्र सरकटे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)