शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पाणीपुरवठा योजनांच्या नव्या निकषांबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: August 7, 2014 23:30 IST

हिंगोली : कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.

हिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजनांसाठी बदललेल्या निकषांबाबत मार्गदर्शनासाठी हिंगोलीत घेण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती. नव्याने आलेल्या ४ शासन निर्णयांमुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे यावर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कामे होण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार आदींनी मार्गदर्शन केले. शासनाने आता पाणीपुरवठा योजनेसाठी दहा टक्के लोकवर्गणी माफ केली आहे. तसेच लोकसंख्येनुसार दरडोई वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे. २00२ पासून २0१३ पर्यंतचे दर रद्द करून नवीन दर लागू केले आहेत. त्यामुळे योजनांची किंमत वाढणार आहे. या शिवाय खर्चाच्या अधिकारामध्येही बदल केला आहे. पूर्वी कार्यकारी अभियंत्यांना ५0 लाखांपर्यंतच्याच कामांना तांत्रिक मान्यता देता येत होती. आता २ कोटींपर्यंत देता येईल. तसेच अधीक्षक अभियंत्यांना ५ ते ७.५ कोटींपर्यंतच्या कामास तर त्यापुढील काम शासनाकडे मान्यतेसाठी पाठविल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळणार आहे. कार्यकारी अभियंता एंबडवार यांनी प्रोजेक्टरद्वारे योजनेविषयी माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना पाणी ही प्रत्येकाची मुलभूत गरज असल्याने ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजे, असे आग्रहपूर्वक पाहण्याचे आवाहन केले. यावर्षीच्या आराखड्यात ३९ गावांना पाणीपुरवठा मंजूर आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहनही केले.सूत्रसंचालन संघरत्न नरवाडे यांनी केले. तर राजेंद्र सरकटे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)