शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:00 IST

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे झालेल्या गारपिटीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे झालेल्या गारपिटीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.तालुक्यात झालेल्या गारपिटीने गहू, हरबरा, फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने २०१४ च्या धर्तीवर शेतकºयांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याकडे केली. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील शेतकरी विठ्ठल शंकरलाल जैस्वाल यांच्या शेतात गहू व हरभरा पिकांच्या झालेल्या नुकसानाची डॉ. सावंत व आ. अब्दुल सत्तार यांनी संयुक्त पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे निवेदन दिले. डॉ. सावंत यांनी प्रशासनाकडून सिल्लोड व सोयगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीचा आढावा घेतला. गारपिटीचे राज्यावरील हे अस्मानी संकट असून हाताशी आलेला घास यातून हिरावला गेल्याचे ते म्हणाले.यावेळी जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवीदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, संचालक दामोदर गव्हाणे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन हनिफ मुलतानी, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, माजी नगरसेवक रघुनाथ घडमोडे, यांच्यासह तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार संजय सोनवणे आदींसह संबंधित अधिकाºयांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.'२०१४ च्या धर्तीवर शेतकºयांना मदत द्या'सिल्लोड व सोयगाव तालुक्यात गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुष्काळसदृश्य स्थिती, कर्जमाफी, बोंडअळीची समस्या व आताच्या गारपिटीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने गारपिटग्रस्तांना तोकडी मदत जाहीर केली असून ती आम्हाला मान्य नाही. अशाच प्रकारचे अस्मानी संकट २०१४ मध्ये आले होते. त्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारने प्रत्येक शेतकºयाला भरीव आर्थिक मदत केली होती. त्याच धर्तीवर मदत व विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे यावेळी केली.