शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:00 IST

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे झालेल्या गारपिटीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे झालेल्या गारपिटीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.तालुक्यात झालेल्या गारपिटीने गहू, हरबरा, फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने २०१४ च्या धर्तीवर शेतकºयांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याकडे केली. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील शेतकरी विठ्ठल शंकरलाल जैस्वाल यांच्या शेतात गहू व हरभरा पिकांच्या झालेल्या नुकसानाची डॉ. सावंत व आ. अब्दुल सत्तार यांनी संयुक्त पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे निवेदन दिले. डॉ. सावंत यांनी प्रशासनाकडून सिल्लोड व सोयगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीचा आढावा घेतला. गारपिटीचे राज्यावरील हे अस्मानी संकट असून हाताशी आलेला घास यातून हिरावला गेल्याचे ते म्हणाले.यावेळी जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवीदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, संचालक दामोदर गव्हाणे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन हनिफ मुलतानी, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, माजी नगरसेवक रघुनाथ घडमोडे, यांच्यासह तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार संजय सोनवणे आदींसह संबंधित अधिकाºयांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.'२०१४ च्या धर्तीवर शेतकºयांना मदत द्या'सिल्लोड व सोयगाव तालुक्यात गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुष्काळसदृश्य स्थिती, कर्जमाफी, बोंडअळीची समस्या व आताच्या गारपिटीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने गारपिटग्रस्तांना तोकडी मदत जाहीर केली असून ती आम्हाला मान्य नाही. अशाच प्रकारचे अस्मानी संकट २०१४ मध्ये आले होते. त्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारने प्रत्येक शेतकºयाला भरीव आर्थिक मदत केली होती. त्याच धर्तीवर मदत व विशेष पॅकेज देण्याची मागणी आ. अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे यावेळी केली.