शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जीटीएलच्या कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात

By admin | Updated: October 11, 2014 00:39 IST

औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे.

औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जीटीएलकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जीटीएलने शहरातील वीजपुरवठ्याचा कारभार हातात घेतल्यानंतर उघड्यावरील विद्युत डीपींना सुरक्षा भिंती बाधण्याचे धोरण स्वीकारले होते. हे धोरण फक्त कागदावरच प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक विद्युत डीपींच्या सुरक्षा भिंतींची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास येते. नागरिक आणि डी.पी.च्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतींचा फायदा नसल्याचे स्पष्ट होत आहे. साईनाथ उद्यान येथील डी.पी.ला झाडांनी चारही बाजूंनी वेढल्यामुळे फक्त खांब दिसत आहेत. त्यामुळे येथे डी.पी. आहे का, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. डी.पी.मध्ये अचानक काही बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्त करणे शक्यच नाही. साईनाथ उद्यान महापालिकेचे आहे. मनपाही झाडांच्या कापणीकडे दुर्लक्ष करीत आहे. झाड आणि डी.पी. एकच झाल्यामुळे वीजपुरवठ्यामुळे बिघाड झाल्यास अडचण होऊ शकते. या भीतीपोटी आम्ही मुलांना उद्यानात खेळण्यासाठी जाऊ देत नाही, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे. जीटीएल किंवा मनपाने डी.पी.चा श्वास मोकळा करून परिसर तात्काळ स्वच्छ करावा, नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी अशोक बारवाल, संतोष कांबळे आदींनीकेली.