शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

जीटीएलच्या कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात

By admin | Updated: October 11, 2014 00:39 IST

औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे.

औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जीटीएलकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जीटीएलने शहरातील वीजपुरवठ्याचा कारभार हातात घेतल्यानंतर उघड्यावरील विद्युत डीपींना सुरक्षा भिंती बाधण्याचे धोरण स्वीकारले होते. हे धोरण फक्त कागदावरच प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक विद्युत डीपींच्या सुरक्षा भिंतींची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास येते. नागरिक आणि डी.पी.च्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतींचा फायदा नसल्याचे स्पष्ट होत आहे. साईनाथ उद्यान येथील डी.पी.ला झाडांनी चारही बाजूंनी वेढल्यामुळे फक्त खांब दिसत आहेत. त्यामुळे येथे डी.पी. आहे का, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. डी.पी.मध्ये अचानक काही बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्त करणे शक्यच नाही. साईनाथ उद्यान महापालिकेचे आहे. मनपाही झाडांच्या कापणीकडे दुर्लक्ष करीत आहे. झाड आणि डी.पी. एकच झाल्यामुळे वीजपुरवठ्यामुळे बिघाड झाल्यास अडचण होऊ शकते. या भीतीपोटी आम्ही मुलांना उद्यानात खेळण्यासाठी जाऊ देत नाही, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे. जीटीएल किंवा मनपाने डी.पी.चा श्वास मोकळा करून परिसर तात्काळ स्वच्छ करावा, नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी अशोक बारवाल, संतोष कांबळे आदींनीकेली.