शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शिष्यवृत्तीचा घोळ सुरूच

By admin | Updated: August 11, 2015 00:59 IST

औरंगाबाद : ज्युनिअर कॉलेज, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या

औरंगाबाद : ज्युनिअर कॉलेज, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ मागील तीन वर्षांपासून चालू असून, संपूर्ण मराठवाड्यात मिळून गतवर्षी सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. तर यंदा शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया अद्याप सुरूच करण्यात आलेली नाही. २०१४-१५ या वर्षात औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत अकरावीपासून पदव्युत्तरपर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज केले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून ६७ हजार ४८४, अनुसूचित जमाती प्रवर्गातून २ हजार ५६५, इतर मागास प्रवर्गातून ४१ हजार १२१ तर भटके आणि विमुक्त प्रवर्गातून ५४ हजार १४ विद्यार्थी, अशा एकूण १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. मराठवाड्यातील इतर चार जिल्ह्यांतही याच प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या आहे. मात्र, २०१४-१५ चे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही सुमारे ५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. विद्यार्थी शिष्यवृत्तीबाबत राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने २०१३-१४ चा निधी देण्यात दिरंगाई केली. त्याचा परिणाम म्हणून २०१४-१५ साली जो काही निधी मंजूर झाला, तो आधीच्या म्हणजे २०१३-१४ सालच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. नव्याने सत्तेवर आलेल्या युती सरकारनेही शिष्यवृत्तीच्या या प्रश्नाकडे दुर्लक्षच केले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी ही बाब मुख्यमंत्री, अर्थमंत्री, तसेच सामाजिक न्यायमंत्र्यांच्या निदर्शनासही आणून दिली; मात्र त्याबाबत काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन प्रक्रिया आहे. मात्र, गतवर्षीचीच शिष्यवृत्ती न देणाऱ्या सरकारने यंदा तर ही प्रक्रियाही सुरू केली नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यामुळे विद्यार्थी प्रचंड कोंडीत सापडला आहे. केवळ शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण पूर्ण करू पाहणाऱ्या दलित, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करीत असल्याची प्रतिक्रिया नागसेनवनातील विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येतात. घरातून येताना ते धान्य घेऊन येतात आणि शिष्यवृत्तीच्या पैशातून तेल, तिखट आणि भाजी घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने ते अडचणीत आल्याची प्रतिक्रिया नागसेनवनातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने दिली.