शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढीसह ग्रामीण विकासावर देणार भर..!

By admin | Updated: May 11, 2016 00:48 IST

राजेश भिसे , जालना ग्रामीण भागाशी आपली नाळ जुळलेली असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीस आपले प्राधान्य राहील,

राजेश भिसे , जालनाग्रामीण भागाशी आपली नाळ जुळलेली असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीस आपले प्राधान्य राहील, अशी भूमिका जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंगळवारी मांडली.शिवाजीराव जोंधळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. हे टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसायास शेतकऱ्यांना उद्युक्त केले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीवर आपला विशेष भर राहील. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांद्वारे पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका हा कृषी क्षेत्राला बसलेला आहे. म्हणूनच आगामी काळात जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलली जातील. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून इतर क्षेत्रांच्या विकासाकडे आपले लक्ष असेल. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे याच जिल्ह्यातील आहेत. स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. त्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. आपल्या जिल्ह्यातही हे मिशन युद्धपातळीवर राबविण्याचा आपला प्रयत्न असेल. मिशन यशस्वी करण्यासाठी जनजागृती व इतर साधनांचा प्रभावीपणे वापर केला जाईल. ग्रामीण भागातील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार आहे. त्यात संबंधित गावातील समस्या सोडविण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल. त्याच्या अंमलबजावणीकडेही आपले विशेषत्वाने लक्ष असेल. त्याचप्रमाणे नागपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविला जाईल. जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरला आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठरविक दिवशी एका गावात संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यात संबंधित गावातील तक्रारींचा निपटारा केला जाईल.जालना शहरात रेशिम क्लस्टर मंजूर झालेले आहे, अशी माहिती कळते आहे. मात्र, ते पूर्णत्वाकडे गेलेले नाही. रेशिम उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय व महिलांचे सक्षमीकरण करणारा व्यवसाय आहे. म्हणूनच संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे रेशिम क्लस्टर लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आपण विशेषत्वाने लक्ष देवू, असे जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले.नगर व इतर जिल्ह्यांमध्ये शेतकरी शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांचे अर्थाजन सुरुच राहते. हीच पद्धती जालना जिल्ह्यात राबविण्याचा प्रयत्न आहे.