शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढीसह ग्रामीण विकासावर देणार भर..!

By admin | Updated: May 11, 2016 00:48 IST

राजेश भिसे , जालना ग्रामीण भागाशी आपली नाळ जुळलेली असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीस आपले प्राधान्य राहील,

राजेश भिसे , जालनाग्रामीण भागाशी आपली नाळ जुळलेली असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीस आपले प्राधान्य राहील, अशी भूमिका जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंगळवारी मांडली.शिवाजीराव जोंधळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. हे टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसायास शेतकऱ्यांना उद्युक्त केले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीवर आपला विशेष भर राहील. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांद्वारे पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका हा कृषी क्षेत्राला बसलेला आहे. म्हणूनच आगामी काळात जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलली जातील. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून इतर क्षेत्रांच्या विकासाकडे आपले लक्ष असेल. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे याच जिल्ह्यातील आहेत. स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. त्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. आपल्या जिल्ह्यातही हे मिशन युद्धपातळीवर राबविण्याचा आपला प्रयत्न असेल. मिशन यशस्वी करण्यासाठी जनजागृती व इतर साधनांचा प्रभावीपणे वापर केला जाईल. ग्रामीण भागातील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार आहे. त्यात संबंधित गावातील समस्या सोडविण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल. त्याच्या अंमलबजावणीकडेही आपले विशेषत्वाने लक्ष असेल. त्याचप्रमाणे नागपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविला जाईल. जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरला आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठरविक दिवशी एका गावात संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यात संबंधित गावातील तक्रारींचा निपटारा केला जाईल.जालना शहरात रेशिम क्लस्टर मंजूर झालेले आहे, अशी माहिती कळते आहे. मात्र, ते पूर्णत्वाकडे गेलेले नाही. रेशिम उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय व महिलांचे सक्षमीकरण करणारा व्यवसाय आहे. म्हणूनच संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे रेशिम क्लस्टर लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आपण विशेषत्वाने लक्ष देवू, असे जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले.नगर व इतर जिल्ह्यांमध्ये शेतकरी शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांचे अर्थाजन सुरुच राहते. हीच पद्धती जालना जिल्ह्यात राबविण्याचा प्रयत्न आहे.