शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

राजकीय पक्षात गटबाजी

By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST

कंधार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश पातळीवर शह-काटशहाचे राजकारण नेत्याकडून खेळले जात आहे़

कंधार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश पातळीवर शह-काटशहाचे राजकारण नेत्याकडून खेळले जात आहे़ त्याची लागण तालुकास्तरावर झाली आहे़ त्यातच प्रमुख राजकीय पक्षात गटबाजी उफाळून आल्याने सामान्य कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरल्याचे चित्र आहे़मन्याड खोऱ्यात शेकाप व काँग्रेस पक्षात चुरशीच्या निवडणुका होत असत़ पक्षीय पातळीवर नेते धोरणावरून, मुद्यावरून एकमेकांचे वाभाडे काढत असत़ त्यात पक्षीय कार्यक्रम, सर्वसामान्यांचे हित यावर अधिक भर दिला जात असे़ कालांतराने राजकीय पक्षांची संख्या वाढत गेली़ नेते-कार्यकर्त्यांची संख्या मोठी झाली़ भरपूर कार्यकर्त्यात निष्ठा मात्र नेत्यात विभागत गेल्या़ तरीही राज्य व देशपातळीवरील नेतृत्वाला मानणारा कार्यकर्ता गटबाजीने (ता़स्तरीय) पुरता वैतागल्याच्या घटना जुलै महिन्यात घडल्या़ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागत असल्याने गटबाजीने दर्शन होत असल्याचे बोलले जात आहे़केंद्र शासनाच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने कंधारात आंदोलन केले़ आंदोलनापेक्षा त्यात उघडपणे गटबाजी समोर आली़ बॅनरवरील मजकूर व त्यावर असलेल्या नावाला एका गटाने आक्षेप घेतला़ घोषणाबाजी कोणती करायची? यावर बरीच एकमेकावर शेरेबाजी करण्यात आली़ लोहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते निष्क्रीय होण्यापेक्षा नेतेच सैरभैर झाले आहेत़ केंद्रात भाजपा (एनडीए) सरकार आल्याने तालुक्यात उत्साह संचारला़ नेते-कार्यकर्ते सर्वसामान्यांशी एकरूप होवून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, अशी भावना व्यक्त होवू लागली़ परंतु लोकसभा निवडणुकीत अतिशय एकमेकांशी विचार-विनिमय करून प्रचार यंत्रणा राबविणारे अचानक एकमेकांचे उणे-दुणे काढू लागले़ उभे दोन गट मजबूतपणे समोर आले़ लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीत दिसणार का असा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे़ लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत कंधार-लोह्यात विसंवाद आला होता़ निवडणुकीनंतर भाजपातील गटबाजी उघडपणे समोर आली़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज दोन नेत्यात गटबाजी असल्याचे मतदारसंघातील सर्वच नागरिकांना माहीत आहे़ कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत़ वरिष्ठ पातळीवर दोन नेत्यांवर कार्यकर्त्यांची निष्ठा असली तरी स्थानिक पातळीवर मात्र गटबाजीत कार्यकर्ते जोडले गेले आहेत़ येथील दोन्ही नेते जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात़ (वार्ताहर)कार्यकर्ते संभ्रमातमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले़ यामुळे पक्षात राज्यपातळीवर मोठा उत्साह संचारला़ परंतु कंधार तालुक्यात मात्र गटबाजी विकोपाला गेली आहे़ ११ जुलै रोजी एका गटाने धरणे आंदोलन केले़ त्याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेत कार्यक्षेत्राचा प्रश्न उपस्थित केला़ पक्ष प्रतिमा खराब होत असल्याची बाब समोर आणली व दुसऱ्या पक्षाचे हस्तक असल्याचा आरोप केला़ पक्षाच्या वतीने १४ जुलैला मोर्चा आयोजित केल्याचे जाहीर केले़ मुळ व उपरे असा मनसेतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे मानली जातात़ एकपक्ष असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र गटबाजी समोर आली़