शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

चांधई ठोंबरीत भीषण पाणी समस्या

By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST

राजूर : चांदई ठोंबरी येथे भीषण पाणी समस्या निर्माण झाली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.

राजूर : चांदई ठोंबरी येथे भीषण पाणी समस्या निर्माण झाली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे. गांवकऱ्यांच्या पाणी समस्येकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने गांवच्या पाण्याची समस्या सोडवण्यात यावी, नसता तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे. याविषयी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, चांदई ठोंबरी गावासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहे. परंतू ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या दोन महिन्यापासून ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहे. गावाला महात्मा गांधी तंटामुक्त व स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळविलेला आहे. तसेच गांवची वसुली सुध्दा शंभर टक्के आहे. मात्र सरपंच व ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यांना मुलभूत सोयीपासून वंचित राहावे लागत आहे. गावात पाणी समस्येसह नाल्या सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच ग्रामसेविका पंधरा दिवसांपासून गांवात येत नसल्याने सामान्य जनतेच्या कामाची अडवणूक होत आहे. विशेष म्हणजे ग्रामसेविका काळपांडे या १ मे महाराष्ट्र दिनी सुध्दा गैरहजर होत्या. याप्रकरणाची चौकशी करून ग्रामस्थांच्या पाण्याची सोय करण्यात यावी, नसता २८ मे पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर शेख नजीर शेख करीम, नारायण ठोंबरे, डिगांबर शेजूळ, शांतीलाल राजपूत, उत्तम रावळकर, विष्णू कदम, भगवान रावळकर, परमेश्वर ठोंबरे, कृष्णा कदम, विष्णू ठोंबरे, भाऊसाहेब ठोेंबरे, नंदकिशोर कदम, रामनाथ हराळकर, शामराव कदम, विठ्ठल भाग्यवंत, बाबू ठोंबरे, मधूकर आदबने, गजानन अहिले, संजू कदम, जगन ठोबरे, सुभाष ठोंबरे, महादू ठोंबरे, लिंंबा कदम यांच्यासह ३५ जणांच्या सह्या आहेत.