शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

गावात नळयोजना असताना घशाला कोरड

By admin | Updated: May 13, 2014 01:06 IST

इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.

 इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. अशा स्थितीत नळयोजनेच्या कामाचे नियोजनाअभावी नळयोजना असून कुरूंदावासियांना पाणी मिळालेले नाही. परिणामी गावासाठी योजना असूनही ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. १५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या कुरूंद्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. घरोघरी बोअर व हातपंप असल्याने सध्यातरी पाणी टंचाई भेडसावत नाही. यंदा अधिक पाऊस पडल्यामुळे पाणीपातळी खालावली नाही. ३० वर्षांपूर्वीची नळयोजना पूर्णत: मोडकळीस आल्यानंतर या गावाचा २२ गाव नळ योजनेमध्ये समावेश करण्यात आला. युती सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेली ही नळयोजना आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर जेमतेम दोन महिने पाच दिवसाआड पाणी अर्ध्या गावाला मिळाले. त्यानंतर २२ नळ योजना देखील कोलमडली. त्यामुळे शासनस्तरावर नव्याने राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. ४५ लाख रुपयांच्या निधीमधून सायफन कालव्यावर विहिर अधिग्रहण करून २२ गाव नळयोजनेच्या पाण्याच्या टाकीत पाणी आणण्यात आले. हे पाणी जुन्या पाईपलाईनद्वारे गावात सोडण्यात येणार होते; परंतु २२ गाव नळयोजनेतील पाईपलाईन जागो-जागी फुटल्याने गावात पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे नळयोजना मार्गी लागलेली असताना देखील कुरूंदावासियांना पाणी मिळालेले नाही. नळयोजना मार्गी लागून जवळपास एका वर्षाचा कालावधी होत आहे. उन्हाळा संपत आला तरी नळ योजनेचे पाणी आलेले नाही. नवीन पाईप करण्यासाठी व दुरूस्तीसाठी निधीची मागणी कुरूंदा ग्रा.पं. ने केली होती. त्याची सध्यातरी दखल घेतल्या गेली नाही. कुरूंदा गावासाठी तीन नळयोजना आखण्यात आल्या. त्यापैकी दोन नळयोजना कायमच्या बंद पडल्या आहेत. सध्याची राष्टÑीय जल नळयोजना पाईपलाईनच्या नियोजनाअभावी कुचकामी ठरली आहे. गावाची लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचा मुबलक साठा पाहिजे. नळयोजना मार्गी लागली तरी पाण्याचा नियोजन आराखडा शासनस्तरावर आखण्यात आला नाही. नेतेमंडळीचे झाले दुर्लक्ष कुरूंद्यातील नळ योजनेकडे प्रशासनासह नेतेमंडळी देखील साफ दुर्लक्ष करीत आहेत. पाण्याचा मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी आणण्यास अपयश आल्याने राष्टÑीय जल नळयोजना अडगळीत पडली आहे.