शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मृत्यूचे दु:ख दोनदा कोसळले; अंत्यविधी झाल्याचा नातेवाईकांचा समज झाला अन मृतदेह ४ दिवस घाटीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:00 IST

सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत उपचार सुरू असताना ४ डिसेंबर रुग्णाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनातेवाईकांनी आणून दिली मृत्यूपावती 

औरंगाबाद : ७२ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह तब्बल ४ दिवस घाटीतील शवागृहातच पडून राहिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. अंत्यविधी प्रशासनाकडून केला जाईल म्हणून मृतदेह पाहून नातेवाईक निघून गेले; परंतु मनपाकडून अंत्यविधीची परवानगी आणण्यासाठी नातेवाईकच नसल्याने मृतदेह तसाच राहिला. या प्रकाराविषयी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर या मृतदेहावर  मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शहानूरवाडी येथील ७२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाच्या उपचारासाठी २५ नोव्हेंबर रोजी घाटीत दाखल करण्यात आले.  सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत उपचार सुरू असताना ४ डिसेंबर रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली. रुग्णवाहिकेत मृतदेह पाहून नातेवाईक घाटीतून रवाना झाले. मात्र, मंगळवारी घाटीतून नातेवाईकांना फोन आला आणि रुग्णाचा अंत्यविधी बाकी असून, घाटीत येण्यास सांगण्यात आले. ही बाब ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. ४ डिसेंबर रोजी अंत्यविधी झालेला असताना आता पुन्हा का बोलविण्यात आले, ४ तारखेला अन्य व्यक्तीचाच अंत्यविधी झाला का, असा प्रश्न नातेवाईकांना पडला. त्यामुळे त्यांनी घाटीत धाव घेतली. तेव्हा घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मनपाकडून अंत्यविधीची परवानगी आणून अखेर बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. 

समन्वय, संवादाचा अभाव४ तारखेला रात्री ११ वाजता मृत्यूची माहिती देण्यात आली. अंत्यविधी केला जाईल, असे सांगितले; परंतु त्यासाठी मनपाकडून आम्हाला परवानगी आणावी लागते, हे सांगितले नाही. हे जर सांगितले असते तर इतके दिवस वडिलांचा मृतदेह घाटीत राहिला नसता. फोन नंबर दिलेले होते; परंतु घाटीत संवाद, समन्वय नसल्याने हा प्रकार झाल्याचे रुग्णाच्या मुलाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

घाटी प्रशासन म्हणाले...वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, नातेवाईकांनी दिलेला माेबाईल क्रमांक लागत नव्हता. अंत्यविधीसाठी मनपाची परवानगी नातेवाईकांना आणावी लागते; परंतु मृतदेह पाहून ते रवाना झाले. त्यामुळे मृतदेह तसाच राहिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी