शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतकर्‍यांच्या उत्साहातून हरित क्रांती

By admin | Updated: May 26, 2014 00:46 IST

नांदेड : प्रक्रियायुक्त अन्नधान्य ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा पुढाकार घेतल्यास व उत्साह दाखविल्यास देश सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले़

नांदेड : शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन प्रक्रियायुक्त अन्नधान्य ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा पुढाकार घेतल्यास व उत्साह दाखविल्यास देश सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले़ नवा मोंढा मैदानावर कृषी विभागाच्या वतीने आयोजित ४ थ्या धान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी धीरजकुमार बोलत होते़ यावेळी मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांची उपस्थिती होती़ जिल्हाधिकारी म्हणाले, बळीराजाच्या कष्टावर सर्वांचे जीवन अवलंबून आहे़ निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकर्‍यांपुढे अनेक समस्या उभ्या राहतात़ त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे़ इस्त्रायल देशात कमी पाऊस असूनही तेथील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आज कृषी उत्पादनात वाढ झाली़ त्यामुळे आता भारतीय शेतकर्‍यांनीही नवीन आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन उत्पन्न वाढवावे़ निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी धान्य महोत्सव उशिराने घ्यावा लागला़ अशा धान्य महोत्सवाचे आयोजन तालुकास्तरावर किंवा मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी आयोजित करता येईल का याची तपासणी करण्यात येईल़ तेथे शेतकर्‍यांना आपला शेतमाल विकता येईल़ दैनंदिन विक्रीकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील़ यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात होत असून कमी पावसाची शक्यता लक्षात घेवून शेतकर्‍यांनी पीक नियोजन करावे़ सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासू नये म्हणून स्वत:कडील बियाणेच लागवडीसाठी वापरावे़ तर मनपा आयुक्त श्रीकांत म्हणाले, धान्य महोत्सवातून शेतकर्‍यांचा माल थेट जनतेपर्यंत पोहोचते़ रासायनिक खत वापरुन शेतमाल उत्पादन घेण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करुन शेतमाल पिकविला तर लोकांचे जीवनमान सुधारेल़ यावेळी डॉ़ शिवाजीराव शिंदे, रामराव कदम, संजय सूर्यवंशी, माधवराव पाटील झरीकर, भागवत देवसरकर, दिलीप पावडे, कृषी विकास अधिकारी एम़ टी़ गोंडेस्वार, प्रभारी प्रकल्प संचालक वैशाली कुलकर्णी, पंडित मोरे, उपसंचालक एस़ व्ही़ लाडके, उत्तम शिवणगावकर, उपस्थित होते़ प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस़ जी़ पडवळ, सूत्रसंचालन शिवराज मुगावे तर तालुका कृषी अधिकारी आऱ एम़ देशमुख यांनी आभार मानले़ पाणलोट चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या वैष्णवी महाबळे, अश्विनी नांदेडकर, कावेरी सुवर्णकार, राजश्री जकीलवाड, कौशल थोरात, ऋतुजा खानापूरकर यांना बक्षिसे देण्यात आली़ (प्रतिनिधी)