शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज ग्रामपंचायतीचे गरवारे कंपनीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:13 IST

वाळूज येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी गरवारे कंपनीला साकडे घालण्यात आले आहे.

वाळूज महानगर: वाळूज येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी गरवारे कंपनीला साकडे घालण्यात आले आहे. टँकरचा प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्यात आला आहे.

एमआयडीसीकडून वाळूजला मिळणाऱ्या पाणी कोट्यात कपात झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहेत. सध्या गावात आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच पाणी पुरवठा कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नळयोजना असलेल्या वसाहतीत आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा सुरु असला तरी ज्या वसाहतीत नळयोजना नाही, अशा भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान, वाळूज गावात दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक बांधीलकी जोपासात गरवारे उद्योग समूहाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरु असल्यामुळे किमान उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबत असते. यंदाच्या उन्हाळ्यात गावात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने गरवारे उद्योग समूहाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी प्रस्ताव देण्यात आल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले. पाणी टंचाई असलेल्या वसाहतीत पाण्याच्या टाक्या ठेवुन या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा आशयाचे पत्रही ग्रामपंचायतीकडून गरवारे समुहाला देण्यात आले आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई