शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार लाभार्थ्यांना अनुदान

By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST

कडा : आष्टी तालुक्यातील तब्बल सहा हजार वृद्ध, निराधार, भूमिहिन, विधवा, परित्यक्त्या आदी लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत महिना ६०० रुपये आर्थिक अनुदान

कडा : आष्टी तालुक्यातील तब्बल सहा हजार वृद्ध, निराधार, भूमिहिन, विधवा, परित्यक्त्या आदी लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत महिना ६०० रुपये आर्थिक अनुदान मिळू लागले आहे. शासनाच्या या योजनेचा फायदा मिळत असल्याने अनेकांचे जगणे सुसह्य झाले आहे. निराधार महिला किंवा पुरूषांना सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने वृद्धापकाळात त्यांची परवड होते. आष्टी तालुक्यात अनेक निराधार ७० ते ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. वय झाल्यामुळे त्यांना शारीरिक कष्टाची कामेही होत नाहीत. अगोदरचेच अठराविश्व दारिद्रय. त्यात वय झाल्याने आर्थिक उत्पन्नही मिळत नाही. अशावेळी अनेक वृद्ध, निराधारांना विपन्नावस्था येते. जगावे की मरावे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर निर्माण होतो. अशावेळी त्यांच्यासाठी श्रावणबाळ योजना फलदायी ठरल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. ज्या स्त्री- पुरूषांना सांभाळण्यासाठी कोणीही नाही व त्यांना शारीरिक कामेही होत नाहीत. परिणामी त्यांची उपासमार सुरू आहे. अशा ४ हजार ७९५ स्त्री, पुरूषांना या योजनेचा लाभ आष्टी तालुक्यात दिला गेला आहे. आष्टी येथील तहसीलमध्ये तालुक्यातून सतत वृद्ध, निराधारांची ये- जा असते. अशांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी व त्यांना वेळच्यावेळी आर्थिक मदत मिळावी, यासाठी येथे तालुका समन्वय समितीने वेळच्यावेळी बैठका घेऊन अनेकांचे अर्ज मंजूर केले. अशा लाभार्थ्यांना मानधन मिळू लागल्याने वृद्धापकाळात त्यांचा भुकेचा प्रश्न मिटला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी सांगितले. अनेक कारणांनी पन्नाशीही न ओलांडलेल्या महिला विधवा होतात. अशा महिलांसमोरही आयुष्य कसे जगावे असा प्रश्न असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदारच हरवल्याने अनेक महिला हतबल झालेल्या असतात. कधी-कधी अशा विधवा महिलांवर त्यांच्या लहान- लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्नही असतो. अशा महिला खचून जाऊन नयेत व त्यांना त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करता यावा, यासाठी ४०० पेक्षा अधिक विधवांना मासिक ६०० रुपये मानधन सुरू करण्यात आले आहे. हे मानधन अल्प असले तरी विधवा महिलांना आपले जीवन जगण्यासाठी मदतीचे ठरत असल्याचे येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या छाया खंडागळे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत तब्बल १०२० लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचाही लाभ मिळालेला आहे. तर इंदिरा गांधी योजनेचाही काही लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. एकूण ६ हजार २१५ लाभार्थ्यांना अनुदान मिळत असल्याची माहिती आष्टीचे तहसीलदार राजीव शिंदे, श्रावणबाळ समितीचे तालुकाध्यक्ष राम मधुरकर यांनी सांगितले. शासनाच्या या योजनेचा वृद्ध, विधवा, असाह्य यांना लाभ मिळाला असल्याने जीवन जगण्यास अनेकांना फायदा झाला असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय खंडागळे यांनी सांगितले. (वार्ताहर)