शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सहा हजार लाभार्थ्यांना अनुदान

By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST

कडा : आष्टी तालुक्यातील तब्बल सहा हजार वृद्ध, निराधार, भूमिहिन, विधवा, परित्यक्त्या आदी लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत महिना ६०० रुपये आर्थिक अनुदान

कडा : आष्टी तालुक्यातील तब्बल सहा हजार वृद्ध, निराधार, भूमिहिन, विधवा, परित्यक्त्या आदी लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत महिना ६०० रुपये आर्थिक अनुदान मिळू लागले आहे. शासनाच्या या योजनेचा फायदा मिळत असल्याने अनेकांचे जगणे सुसह्य झाले आहे. निराधार महिला किंवा पुरूषांना सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने वृद्धापकाळात त्यांची परवड होते. आष्टी तालुक्यात अनेक निराधार ७० ते ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. वय झाल्यामुळे त्यांना शारीरिक कष्टाची कामेही होत नाहीत. अगोदरचेच अठराविश्व दारिद्रय. त्यात वय झाल्याने आर्थिक उत्पन्नही मिळत नाही. अशावेळी अनेक वृद्ध, निराधारांना विपन्नावस्था येते. जगावे की मरावे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर निर्माण होतो. अशावेळी त्यांच्यासाठी श्रावणबाळ योजना फलदायी ठरल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. ज्या स्त्री- पुरूषांना सांभाळण्यासाठी कोणीही नाही व त्यांना शारीरिक कामेही होत नाहीत. परिणामी त्यांची उपासमार सुरू आहे. अशा ४ हजार ७९५ स्त्री, पुरूषांना या योजनेचा लाभ आष्टी तालुक्यात दिला गेला आहे. आष्टी येथील तहसीलमध्ये तालुक्यातून सतत वृद्ध, निराधारांची ये- जा असते. अशांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी व त्यांना वेळच्यावेळी आर्थिक मदत मिळावी, यासाठी येथे तालुका समन्वय समितीने वेळच्यावेळी बैठका घेऊन अनेकांचे अर्ज मंजूर केले. अशा लाभार्थ्यांना मानधन मिळू लागल्याने वृद्धापकाळात त्यांचा भुकेचा प्रश्न मिटला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी सांगितले. अनेक कारणांनी पन्नाशीही न ओलांडलेल्या महिला विधवा होतात. अशा महिलांसमोरही आयुष्य कसे जगावे असा प्रश्न असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदारच हरवल्याने अनेक महिला हतबल झालेल्या असतात. कधी-कधी अशा विधवा महिलांवर त्यांच्या लहान- लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्नही असतो. अशा महिला खचून जाऊन नयेत व त्यांना त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करता यावा, यासाठी ४०० पेक्षा अधिक विधवांना मासिक ६०० रुपये मानधन सुरू करण्यात आले आहे. हे मानधन अल्प असले तरी विधवा महिलांना आपले जीवन जगण्यासाठी मदतीचे ठरत असल्याचे येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या छाया खंडागळे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत तब्बल १०२० लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचाही लाभ मिळालेला आहे. तर इंदिरा गांधी योजनेचाही काही लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. एकूण ६ हजार २१५ लाभार्थ्यांना अनुदान मिळत असल्याची माहिती आष्टीचे तहसीलदार राजीव शिंदे, श्रावणबाळ समितीचे तालुकाध्यक्ष राम मधुरकर यांनी सांगितले. शासनाच्या या योजनेचा वृद्ध, विधवा, असाह्य यांना लाभ मिळाला असल्याने जीवन जगण्यास अनेकांना फायदा झाला असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय खंडागळे यांनी सांगितले. (वार्ताहर)