शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

तीन वर्षांपासून मिळाले नाही अनुदान

By admin | Updated: May 14, 2014 00:26 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही.

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही. आजस्थितीत बीड तहसील कार्यालयात शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. दारिद्र्यात जगत असलेल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्यावर त्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीन त्या कुटुंबास वीस हजार रूपयांची आर्थिक मदत तात्काळ करण्याची योजना आहे. यासाठी शासन वेळोवेळी तहसील कार्यालयाला निधी उपलब्ध करून देते. मात्र प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या काम चुकार पणामुळे बीड तालुक्यातील ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा अपघातील मृत्यू झाला आहे. ती कुटुंबे शासकीय मदतीपासून वंचित आहेत. बीड तहसील कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे २५ ते ३० हजार कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. यातील काही कुंटुंबातील कर्त्यापुरूषांचा अपघाती मुत्यू झालेला आहे. अगोदरच गरिबी त्यात कर्ता पुरूष दगवल्याने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची उपासमार सुरू आहे. शासन या कुटुंबांची अवहेलना होऊ नये यासठी प्रति कुटुंबाला २० हजार रूपयांची मदत करते, परंतु या योजनेचा पुरता बोजवारा उडविला. अधिकार्‍यांना स्वाक्षरीला वेळ नाही बीड तहसील कार्यालयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरूष गेलेल्या शंभरच्या जवळपास कुटुंबांनी २० हजार रूपयांच्या मदतीसाठी अर्ज केलेले आहे. मात्र सर्व प्रकरणे मागील तीन वर्षापासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी तहसीलदारांना वेळ नसल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे बहुतांश प्रकरणांत नायब तहसील व अव्वल कारकु नांच्या स्वाक्षर्‍या झालेल्या आहेत. केवळ बीड तहसीलदारांच्या स्वाक्षरीमुळे शंभराच्या जवळपास प्रकरणे प्रलंबित आहेत. मी स्वत: लक्ष देणार - जिल्हाधिकारी तहसिल कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये मी स्वत: लक्ष देणार आहे. प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लागतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.