शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून मिळाले नाही अनुदान

By admin | Updated: May 14, 2014 00:26 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही.

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही. आजस्थितीत बीड तहसील कार्यालयात शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. दारिद्र्यात जगत असलेल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्यावर त्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीन त्या कुटुंबास वीस हजार रूपयांची आर्थिक मदत तात्काळ करण्याची योजना आहे. यासाठी शासन वेळोवेळी तहसील कार्यालयाला निधी उपलब्ध करून देते. मात्र प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या काम चुकार पणामुळे बीड तालुक्यातील ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा अपघातील मृत्यू झाला आहे. ती कुटुंबे शासकीय मदतीपासून वंचित आहेत. बीड तहसील कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे २५ ते ३० हजार कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. यातील काही कुंटुंबातील कर्त्यापुरूषांचा अपघाती मुत्यू झालेला आहे. अगोदरच गरिबी त्यात कर्ता पुरूष दगवल्याने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची उपासमार सुरू आहे. शासन या कुटुंबांची अवहेलना होऊ नये यासठी प्रति कुटुंबाला २० हजार रूपयांची मदत करते, परंतु या योजनेचा पुरता बोजवारा उडविला. अधिकार्‍यांना स्वाक्षरीला वेळ नाही बीड तहसील कार्यालयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरूष गेलेल्या शंभरच्या जवळपास कुटुंबांनी २० हजार रूपयांच्या मदतीसाठी अर्ज केलेले आहे. मात्र सर्व प्रकरणे मागील तीन वर्षापासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी तहसीलदारांना वेळ नसल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे बहुतांश प्रकरणांत नायब तहसील व अव्वल कारकु नांच्या स्वाक्षर्‍या झालेल्या आहेत. केवळ बीड तहसीलदारांच्या स्वाक्षरीमुळे शंभराच्या जवळपास प्रकरणे प्रलंबित आहेत. मी स्वत: लक्ष देणार - जिल्हाधिकारी तहसिल कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये मी स्वत: लक्ष देणार आहे. प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लागतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.