शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान; आकडेवारी प्रशासनाच्या दप्तरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:54 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला ...

ठळक मुद्देमाहितीची जमवाजमव: तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत असल्याचा दावा

औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता टाकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याबाबतची माहिती अजून तरी प्रशासनाच्या दप्तरीच अडकली आहे. महसूल, कृषी तसेच बँकेतील अधिकाऱ्यांच्या ताळमेळात सदरील योजनेची माहिती सोमवारपर्यंत समोर आलेली नव्हती.विभागात आजवर १४ लाख ९६ हजार पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती योजनेच्या अनुषंगाने आॅनलाईन अपलोड केली आहे. त्यातील किती शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे मिळाले, याबाबत कोणतीही माहिती महसूल प्रशासनाला नाही. तसेच गाव, तालुका, जिल्हास्तरावर बँकांमध्ये किती शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले याबाबत मात्र कोणतीही माहिती बँकांकडे उपलब्ध नाही.ज्या शेतकºयांचे आधार कार्डवर जे नाव आहे, तेच नाव बँक खात्यावर असावे. यासह इतर अचूक माहिती गावपातळीवरून भरून घेण्यात येत आहे. त्यातील माहिती चुकीची भरली किंवा आधार कार्ड व बँक खात्यावरील नावांमध्ये फरक आढळला, तर त्या शेतकºयांना निधी मिळण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित माहिती अपलोड करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.१७ लाख कुटुंबे पात्र२५ फेब्रुवारीपर्यंत विभागातील १७ लाख ३९ हजार ४७४ कुटुंबे पात्र ठरली आहेत. यातील काही कुटुंबांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांना या योजनेतून प्रतिकुटुंबास दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येणार आहेत. अल्पभूधारकांना ही योजना लागू राहणार आहे. ज्या शेतकºयांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्या शेतकरी कुटुंबांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी